विराट कोहलीने नुकतच भारतीय कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना विराटच्या या निर्णयामुळे धक्का बसलाय. कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचा संदर्भ देत त्याच्या सहकारी खेळाडूंकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र असं असतानाच पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक विचित्र वक्तव्य केलंय. असं वाटतंय की, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे विराट कर्णधारपद सोडण्याची वाटच पाहत होते, अशा पद्धतीचं वक्तव्य लतीफने केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने त्याचं अभिनंदन केलं होतं. मात्र असं असतानाही पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला विराट कर्णधारपदावरुन पायउतार होण्याची वाट रोहित आणि के. एल. राहुल पाहत होते असं वाटतंय. “विराट कोहली हा जागतिक स्तरावरील खेळाडू आहे. भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल? रोहितला प्रकृतीसंदर्भातील समस्या असून त्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण दौऱ्यामध्ये खेळताना दिसला नाही. म्हणजेच रोहित सध्या फारच अनफीट आहे. के. एल. राहुल कर्णधार होण्याच्या पात्रतेचा नाहीय,” असं राशिद लतीफ म्हणालाय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma kl rahul were waiting for virat kohli to quit test captaincy said former pakistan captain rashid latif scsg
First published on: 19-01-2022 at 09:08 IST