scorecardresearch

Premium

T20 WC : ‘‘…ती दोन षटकं महत्वाची ठरली”, भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO

भारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या याबाबत आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पराभवाचं विश्लेषण केलं आहे.

Sachin_on_India_Pak
T20 WC : ‘‘…ती दोन षटकं महत्वाची ठरली", भारत-पाक सामन्यानंतर सचिननं केलं विश्लेषण; पाहा VIDEO

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. पाकिस्तानने २९ वर्षानंतर भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत केलं आहे. यानंतर भारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या याबाबत आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पराभवाचं विश्लेषण केलं आहे.

“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगला राहिला. पाकिस्तानचा संघ खरंच चांगला खेळला. भारतासाठी हा सामना खरंच कठीण होता. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मैदानात दवही पडलं होतं. ही सर्व कारणं आहेतच. पण आपली धावसंख्या कमी पडली. आपण २०-२५ धावांनी कमी पडलो. खेळपट्टी चांगली होती. या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळत नव्हता. तसेच फिरतही नव्हता. शाहिन आफ्रिदीने सुरुवातीलाच भारताला धक्के दिले. रोहित शर्माला पहिल्या षटकात बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात केएल राहुलला तंबूचा रस्ता दाखवला. हे दोघंही शाहिनच्या गोलंदाजीचा सामना करताना योग्य पोझिशनमध्ये नव्हते. १४० च्या गतीने चेंडू टाकताना गोलंदाज स्विंग आणि स्टम्पमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये शाहिन आफ्रिदी यात चांगला आहे. काही चांगले गोलंदाज आहेत. ते योग्य ठिकाणी यॉर्कर चेंडू टाकतात.कारण या चेंडूसाठी फलंदाज तसा तयार नसतो. फलंदाज गुड लेंथवर फोकस करून असतो. हेच शाहिननं केलं. हसन अली, रौफ, शादाब आणि हाफिज या सर्वांनी चांगली गोलंदाजी केली.”, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितलं.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Gunratna sadavarte
“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”

“भारतीय संघ बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानसोबत खेळला. त्यामुळे गोलंदाजी समजण्यासाठी फलंदाजांनी वेळ घेतला. आपण ३ गडी झटपट गमावले. सुर्यकुमार आला आणि चांगले फटके मारले. ऋषभ पंत आणि विराट कोहली दरम्यान चांगली भागीदारी केली.पण आपण चुकीच्या वेळी गडी गमावले.”, असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं. “सर्वांनाच माहिती आहे ऋषभला षटकार मारणं किती आवडतं. पण शादाब विरुद्ध खेळताना ऋषभ पंतने चांगली योजना आखली.” असं सचिन तेंडुलकरने सांगितलं.

IND vs PAK : ‘‘वरुणच्या गोलंदाजीत काही Mystery नव्हती, पाकिस्तानातील पोरं…”; तुरुंगात गेलेला क्रिकेटपटू बरळला!

“बाबर आझम आणि रिझवानने सातत्याने स्ट्राईक बदलत राहिले. काही चेंडूंवर त्यांनी मोठे फटकेही मारले. जर सुरुवातीला गडी बाद करण्यात यश मिळालं असतं तर कदाचित दबाव वाढला असता. पण पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. चेंडू पाहिजे तितका स्विंग झाला नाही. दवही पडलं होतं.सातव्या आणि आठव्या षटकात जर गडी बाद करण्यात यश मिळालं असतं तर सामन्यात आलो असतो. पण तसं झालं नाही. ९ षटकात बाबरने जडेजाला षटकार मारला आणि दबाव कमी झाला. त्यानंतर १० व्या षटकात चांगल्या धावा आल्या. ही दोन षटकं महत्वाची ठरली.” असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं. “ही स्पर्धेची सुरुवात आहे. भारतीय संघ नक्कीच पुनरागमन करेल आणि आपल्या आशा असलेल्या निकाल लागेल, असंही सचिन तेंडुलकरने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar on india loss against pakistan rmt

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×