Team India is under pressure from the Indian media: एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर प्रथमच भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळीही भारत घरच्या मैदानावर विश्वविजेता होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. गेल्या दोन टी-२० विश्वचषकात भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो की, भारताच्या कामगिरीचे प्रमुख कारण देशातील मीडिया आहे, जे संघावर दबाव आणते. याच दबावामुळे २०२१ साली भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.

शोएब अख्तरने भारतीय मीडियावर उपस्थित केले प्रश्न –

शोएब अख्तरने रेज स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय मीडिया आपल्या खेळाडूंची काळजी करत नाही. ते त्यांच्यावर खूप दबाव टाकतात जे चुकीचे आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू म्हणाला, ‘मी मीडियाच्या लोकांना सांगू इच्छितो की, थोडा विचार करा. इतका दबाव कोण निर्माण करतो? हा दबाव कसा निर्माण होतो हे मला माहीत आहे पण ते अत्यंत चुकीचे आहे.’

kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Hindi is not Indias national language R Ashwins controversial statement video viral
R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं

पाकिस्तानला होतो फायदा –

यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकाची आठवण करून देताना शोएब अख्तर म्हणाला, ‘मी दुबईत पाहिले. मी तिथे भारताच्या स्थानिक वाहिनीशी बोलत होतो. त्यांनी टीम इंडियाच्या रंगात सर्व काही रंगवले. टीम इंडिया पाकिस्तानला हरवेल एवढेच ते सांगत होते. जेव्हा तुम्ही आम्हाला अंडरडॉग बनवता, तेव्हा आमच्यावरील दबाव संपतो. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते म्हणून आम्ही गेलो आणि सामना जिंकला. हे नेहमीच असेच राहिले आहे.”

हेही वाचा – IND vs PAK: भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्याने पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू संतापला, बंदी घालण्याची केली मागणी

विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली झाली नाही –

२०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने पराभव झाला होता. गतवर्षी त्यांनी पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला असला. तरी भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. २०१९ मध्येही भारताचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला होता. उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

Story img Loader