“आयसीसीच्या अध्यक्षपदावर योग्य व्यक्तीने बसणं गरजेचं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एका खमक्या नेतृत्वाची गरज लागणार आहे. त्यामुळे खेळ माहिती असणारा आणि सध्याच्या जमान्याशी जुळवून घेणारा व्यक्ती आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य ठरेल. गांगुलीसारखा व्यक्ती त्या पदावर बसला तर ते योग्य ठरेल. क्रिकेटसाठी ते फायदेशीर ठरेल, त्याला खेळाविषयी माहिती आहे. तो प्रचंड अनुभवी आहे आणि त्याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आदर आहे.” स्मिथ AFP शी बोलत होता.
सौरव गांगुलीच्या पुढाकाराने बीसीसीायने दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दाखवली. २०१९ साली भारताने बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. सध्या बीसीसीआयसमोर आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याचं मोठं आवाहन असणार आहे. हा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे, त्यामुळे वर्षाअखेरीस हा हंगाम आयोजित करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.