scorecardresearch

Premium

India vs West Indies: कोहली-रोहितच्या मदतीला धावला ‘दादा’, भारताच्या टी-२० संघाच्या निवडीबाबत उपस्थित केला सवाल, म्हणाला…

दोन्ही दिग्गज खेळाडू अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान देऊ शकतात, असं सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.

Team India Squad For West Indies Tour 2023
टीम इंडियाच्या निवडीबाबत सौरव गांगुलीचं मोठं विधान. (Image-Indian Express)

Sourav Ganguly On Virat Kohli And Rohit Sharma : टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरोधात पुढील महिन्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या टी-२० मालिकेसाठी बुधवारी ५ जुलैला भारतीय संघाची घोषणा केली होती. १५ सदस्यांच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीय. अशातच टी-२० च्या संघाच्या निवडीबाबत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० संघात नसल्याने गांगुलीने प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन्ही दिग्गज खेळाडू अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान देऊ शकतात, असं गांगुलीनं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना सौरव गांगुली नेमकं काय म्हणाला?

गांगुलीने एका स्पोर्ट्स माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुम्ही चांगल्या खेळाडूंची निवड केली पाहिजे, हे नक्कीच. ते कोणते खेळाडू आहेत, यामुळे काही फरक पडत नाही. विराट कोहली-रोहित शर्मा या दोघांना अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये स्थान आहे. कोहली-रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय सामने का खेळू शकत नाही, हे मला समजत नाहीय. कोहली आयपीएलदरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये होता. दोन्ही खेळाडू टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही योगदान देऊ शकतात, असं मला वाटतं.”

ICC ODI World Cup 2023 Updates
गोष्ट वर्ल्डकपची तुमच्या भेटीला
south african team thiruvananthapuram viral video
तिरुवनंतपुरम उच्चारताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या नाकीनऊ! शशी थरूर यांनी शेअर केला भन्नाट Video
Virender Sehwag's Big Statement on Team Selection in Team India's Playing XI Said One head many headaches
Virender Sehwag: टीम इंडियाच्या प्लेईंग-११ मधील संघ निवडीवर वीरेंद्र सेहवागचे मोठे विधान; म्हणाला, “डोकं एक, डोकेदुखी अनेक…”
Shoaib Akhtar Disgusting Boast Video Of IND vs PAK Says Wanted To Hurt Thought Sachin Tendulkar Died Felt Bad For MS Dhoni
“मला वाटलं सचिन मेला, मी मुद्दाम..”, शोएब अख्तरची धक्कादायक कबुली! तेंडुलकर, धोनी विरुद्ध रचला डाव

नक्की वाचा – टीम इंडियात पुनरागमनाबाबत पृथ्वी शॉने केलं मोठं विधान, म्हणाला, “मला पुजारासारखी फलंदाजी…”

रोहित आणि कोहलीशिवाय आयपीएल स्टार्स रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मालाही टी-२० मध्ये संधी मिळवण्यात अपयश आलं आहे. यावर बोलताना गांगुली म्हणाला की, युवा खेळाडूंनी खेळत राहावं. त्यांची वेळ नक्कीच येईल. त्यांनी फक्त खेळत राहणं महत्वाचं आहे. फक्त १५ खेळाडूंची संघात निवड करू शकतात आणि ११ खेळू शकतात. त्यामुळे कुणालातरी मुकावं लागणार. त्यांची वेळ नक्कीच येईल, असा मला विश्वास आहे.

भारतचा टी-२० संघ : ईशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कप्तान), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sourav ganguly still believes that virat kohli and rohit sharma can give big contribution for team indias t20 cricket too ind vs wi t20 series nss

First published on: 09-07-2023 at 13:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×