: चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या बॅडमिंटनपटू जोडीने वैद्यकीय कारणास्तव सुदिरमन चषक मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. फिनलंड येथे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या १२ सदस्यीय संघात चिराग-सात्त्विक या जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील जोडीचा समावेश होता. परंतु चिराग आजारपणातून सावरला नसल्यामुळे या जोडीला माघार घ्यावी लागत आहे. सुदिरमन स्पर्धेनंतर होणाऱ्या थॉमस चषक स्पर्धेतही या जोडीच्या सहभागाबाबत साशंका आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने म्हटले. चिराग-सात्त्विकच्या अनुपस्थितीत धु्रव कपिला आणि एमआर अर्जुन जोडीवर भारताच्या दुहेरीची भिस्त असेल. भारतीय संघात किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणित, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी, मालविका बनसोड, अदिती भट, तनिशा क्रॅस्टो, ऋतुपर्ण पांडा यांचा समावेश आहे.