बंगळूरु : ‘फिफा’कडून भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी तुम्ही याकडे फारसे लक्ष देऊ नका, अशी सूचना भारतीय संघाचा तारांकित आघाडीपटू सुनील छेत्रीने आपल्या सहकाऱ्यांना केली आहे.

बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे ‘एआयएफएफ’वर जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) नाराजी व्यक्त करतानाच त्यांच्यावर बंदी घालण्याची ताकीद दिली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडून काढून घेण्याची चेतावनीही ‘फिफा’ने दिली आहे. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला ‘एआयएफएफ’च्या कार्यकारिणी समितीसाठी निवडणुकीचे आदेश दिले होते. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून निवडणुका २८ ऑगस्टला घेतल्या जाणार आहेत.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
ishan kishan & shreyas iyer
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

‘‘मी भारतीय संघातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींकडे तुम्ही फार लक्ष देऊ नका, अशी मी त्यांना सूचना केली आहे. महासंघाशी निगडित व्यक्ती सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. खेळाडू म्हणून आम्ही केवळ मैदानावरील कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. खेळाडू म्हणून स्वत:मध्ये सुधारणा करण्यावर आमचा भर असला पाहिजे. तसेच संधी मिळेल तेव्हा देश किंवा क्लबकडून सर्वोत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे,’’ असे छेत्री म्हणाला.

भारताला यजमानपद लाभलेली ‘फिफा’ कुमारी विश्वचषक स्पर्धा ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे सामने मुंबई, गोवा आणि भुवनेश्वर येथे खेळवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात मान्यता दिली होती. मात्र, आता भारताचे यजमानपद येण्याची चिन्हे आहेत. 

भारतातील यंदाच्या फुटबॉल हंगामाला डय़ुरँड चषक स्पर्धेने सुरुवात (१६ ऑगस्ट) होणार असून दुसऱ्या दिवशी छेत्रीच्या एफसी बंगळूरु संघाचा जमशेदपूर एफसी संघाशी सामना होईल. १३१ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे छेत्रीने नमूद केले.

दत्ता, मिंग यांचे अर्ज फेटाळले

सुब्रता दत्ता आणि लार्सिग मिंग यांनी ‘एआयएफएफ’मधील पदांसाठी केलेले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक पात्रता निकष पूर्ण न केल्यामुळे या दोघांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे, असे ‘एआयएफएफ’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले. दत्ता आणि मिंग हे दोघेही तीन वेळा कार्यकारी समितीवर निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार, त्यांना पुढील चार वर्षे कोणतेही पद भूषवता येणार नाही.