टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने २००७ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे पहिले सत्र खेळण्यासाठी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी पुरुष क्रिकेट संघातील काही प्रमुख खेळाडूंशी संपर्क कसा साधला हे उघड केले. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी टी२० क्रिकेट नवीन होते. या संघाने यापूर्वी टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. अशा परिस्थितीत आयपीएल एवढा मोठा ब्रँड बनेल असे भारतीय खेळाडूंना वाटले नव्हते.

याबाबत रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनी खेळाडूंना आश्वासन दिले होते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा पहिला लिलाव फेब्रुवारी २००८ मध्ये झाला. त्यानंतर टीम इंडियाच्या मोठ्या नावांपैकी एक, वीरेंद्र सेहवाग, इतर खेळाडूंसह, पहिल्यांदा २००७/०८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात याची माहिती मिळाली. इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) १५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्टार स्पोर्ट्सने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

ऑस्ट्रेलियात माहिती मिळाली

यादरम्यान वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “ज्या दिवशी आम्हाला पहिल्यांदा कळवण्यात आले तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. आम्ही ऑस्ट्रेलियात होतो. सुनील गावसकर आणि रवी शास्त्री आमच्याकडे आले आणि म्हणाले की इंडियन प्रीमियर लीग नावाची एक गोष्ट होणार आहे आणि ते आम्हाला त्यांचे सर्व अधिकार देण्यास सांगत आहेत.”

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: दिल्लीत अवतरला सुपरमॅन! केएल राहुलने असा पकडला कॅच की ख्वाजाही झाला अवाक्, पाहा Video

जेव्हा ही लीग सुरू झाली, तेव्हा वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय संघात खेळलेल्या त्या काळातील खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले होते आणि ते सर्व स्टार खेळाडूंचा दर्जा घेऊन या लीगमध्ये खेळायला आले होते. त्यानंतर त्याला परदेशी खेळाडू आणि अनकॅप्ड देशांतर्गत खेळाडूंनी बनलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळावे लागले आणि क्रिकेटच्या जगात हे सर्व नवीन होते. त्याहूनही नवीन म्हणजे खेळाडू कोणत्या संघात खेळणार याचा लिलाव होणार होता.

आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्टार स्पोर्ट्सने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आता वेळ आली आहे. मुलं मोठी झाली आहेत आणि आता क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे आता आपण मोठे झालो आहोत असे वाटते. पण तो दिवस मी विसरू शकत नाही जेव्हा आम्हाला पहिल्यांदा आयपीएलबद्दल तपशीलवार सांगण्यात आले होते.”

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: अ‍ॅक्शन रिप्ले! एकाच षटकात दोन विकेट्स, स्मिथ-लाबुशेनला अश्विनच्या फिरकीने फुटला घाम; Video व्हायरल

सेहवाग पुढे म्हणाला, “मग त्याने आम्हाला आश्वासन दिले की भविष्यात ही खूप मोठी लीग होणार आहे. तुम्ही या लीगला जे काही अधिकार द्याल, ते तुम्ही आज जे काही कमावत आहात त्यापेक्षा तुमची कमाई कितीतरी जास्त असेल हे निश्चित. अर्थात, पैसा हा आणखी एक घटक होता, परंतु त्यावेळी आम्ही विचार करू शकत नव्हतो की हे खरोखर एक मोठे व्यासपीठ आहे जिथे नवीन खेळाडूंना संधी मिळेल आणि ते आमची जागा घेतील.”