scorecardresearch

IND vs SL: ‘त्या सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक…’; भारत-श्रीलंका सामन्यांवर आरोप करणाऱ्यांना सुनील गावसकरांचा टोला

Sunil Gavaskar Statement : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या या एकतर्फी विजयानंतर, सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे मीम्स शेअर केले जाऊ लागले होते. यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी असे करणाऱ्यांना खडसावले आहे.

Sunil Gavaskar reacts to viral memes,
भारत-श्रीलंका सामन्यांवर आरोप करणाऱ्यांना सुनील गावसकरांचा टोला (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Sunil Gavaskar said this is a big slap in face to all people across western border: आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून आठव्यांदा आशिया चषकाकवर नाव कोरले. दोन्ही संघांमधला हा अंतिम सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. भारताने प्रथम श्रीलंकेला १५.२ षटकांत अवघ्या ५० धावांत गुंडाळले. त्यानंतर एकही विकेट न गमावता ६.१ षटकांत लक्ष्य गाठले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या या एकतर्फी विजयानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे मीम्स शेअर होऊ लागले. यावर सुनील गावसकरांनी प्रतिक्रिया दिली.

सीमेपलीकडील सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक –

याबाबत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मीम्स शेअर करणाऱ्यांना खडसावले आहे. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडावा म्हणून भारताला जाणूनबुजून श्रीलंकेविरुद्ध सुपर-४ मध्ये हरायचे होते, असे मानणाऱ्या लोकांवर गावसकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. गावसकर यांनी मिड-डेच्या स्तंभात लिहिले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध २१३ धावांवर बाद झाल्यानंतर भारत मुद्दाम हरला, अशी ओरड करणाऱ्या पश्चिम सीमेपलीकडील सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक आहे. पाकिस्तान अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावा म्हणून भारत मुद्दाम हरत आहे, असे म्हणणारे लोक किती अज्ञानी आणि मूर्ख आहेत.”

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

अशा परिस्थितीत भारत जाणूनबुजून श्रीलंकेकडून का हरेल?

या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होता, जो पावसामुळे वाया गेला होता. पुन्हा सुपर-४ मध्ये भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. जर भारताने हा सामना गमावला असता, तर पाकिस्तानचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडू शकला असता. सुनील गावसकर म्हणाले, “या लोकांनी या शक्यतेचा विचारही केला नाही की, जर भारत श्रीलंकेकडून सामना हरला असता आणि त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेला हरवले असते, त्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे वाया गेला असता, तर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नसता. अशा परिस्थितीत भारत जाणूनबुजून श्रीलंकेकडून का हरेल?”

हेही वाचा – IND vs AUS: ‘त्याच्याकडे इतका अनुभव आहे की…’; आश्विनच्या टीम इंडियातील पुनरागमनावर रोहित शर्माची प्रतिक्रिया

गावसकर पुढे म्हणाले की, “जेव्हा पाकिस्तान श्रीलंकेकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता, तेव्हा पराभवासाठी भारताला दोष देणाऱ्यांना आणखी काही षडयंत्राची अपेक्षा होती, पण ते सर्व काही विसरून स्पर्धेतून बाहेर पडल्याचा आरोप करत होते. कर्णधार बाबरने आझमला फटकारण्यास सुरुवात केली. २०१९ च्या विश्वचषकाच्या गट सामन्यात भारत इंग्लंडकडून पराभूत झाला, तेव्हा अशाच प्रकारचे कट उघडकीस आले होते.”

हेही वाचा – IND vs AUS: “जर मी संजूच्या जागी असतो तर…”; टीम इंडियात सॅमसनची निवड झाल्याने इरफान पठाण निराश, चाहत्यांचे BCCI रोहितवर गंभीर आरोप

माजी कर्णधार म्हणाले की, “धोनीसह सर्वांनी जाणीवपूर्वक संथ फलंदाजी केल्याचा आरोप होता. धोनीला जे ओळखतात ते या गोष्टीची साक्ष देतील की त्याला खेळ शेवटपर्यंत नेणे आणि नंतर धमाकेदार खेळणे आवडते. “इंग्लंडने चमकदार गोलंदाजी केली ज्यामुळे ते तेव्हा तसे करू शकले नाहीत, परंतु मूर्खांना वाटले की त्यांना उपांत्य फेरीतून बाहेर काढण्यासाठी हे जाणूनबुजून केले गेले.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 15:25 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×