भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज बुधवारी टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. रोम येथे झालेल्या सेट्टे कोली करंडक जलतरण स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नटराजने नोंदवलेली ‘अ’ दर्जाची पात्रता वेळ आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) मान्य केली आहे.

‘‘नटराजने नोंदवलेली ५३.७७ सेकंदांची वेळ ‘फिना’कडून मान्य करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) नटराजच्या ऑलिम्पिकमधील सहभागाची मागणी ‘फिना’कडे केली होती. आता श्रीहरी आणि साजन प्रकाश हे भारताचे दोन जलतरणपटू टोक्योसाठी रवाना होतील,’’ असे ‘एसएफआय’कडून सांगण्यात आले.

through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Nuclear Power Corporation of India inviting applications for 400 Executive Trainees post in Mumbai Details Here
NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी! ४०० जागा, ५५ हजारांपर्यंत पगार; ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

ऑलिम्पिक पात्रतेच्या अखेरच्या दिवशी संयोजकांनी बेंगळूरुस्थित नटराजलाही या चाचणीस सहभागी होण्याची संधी दिली होती. आता पहिल्यांदाच भारताचे दोन जलतरणपटू ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करतील.