आज फक्त आणि फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा सर्वत्र आहे. दुबईच्या मैदानावर थोड्या वेळेत दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. टी-२० विश्वचषकाचा हा सर्वात मोठा सामना आहे. दोन्ही देशांचे चाहते आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू आपापल्या संघांबाबत प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनीही पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, या सामन्यापूर्वी इम्रान खानच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले होते. यामध्ये भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी संघाच्या विजयाची आशा व्यक्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी निवेदनात म्हटले, ”या संघात भारताला हरवण्याची प्रतिभा आहे. इंशाअल्लाह पाकिस्तान संघ या सामन्यात भारतीय संघाला नक्कीच पराभूत करेल.”

हेही वाचा – T20 WC : गंमत वाटेल, पण ‘हे’ क्रिकेटपटू भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून खेळलेत!

इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघही भारताला विश्वचषकात हरवू शकलेला नाही. विशेष गोष्ट म्हणजे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी हरवण्याचा सिलसिला १९९२ मध्ये सुरू झाला. त्यावेळी इम्रान खान कर्णधार होते. त्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला ७ वेळा पराभूत केले आहे. याशिवाय टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानला भारताच्या हातून ५ वेळा पराभूत व्हावे लागले आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला खात्री आहे, की त्याचा संघ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवेल. ”आम्ही गेल्या तीन वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत आणि इथल्या परिस्थितीची चांगली माहिती आहे, आम्हाला माहीत आहे की विकेट्स कशा असतील आणि फलंदाजाला कोणते बदल करावे लागतील. जो संघ सामन्याच्या दिवशी चांगला खेळेल तोच जिंकेल. मला वाटते की आम्ही जिंकू”, असे बाबरने म्हटले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup pakistan pm imran khan made a bold statement before india vs pakistan match adn
First published on: 24-10-2021 at 15:33 IST