टी -२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुमारे २८ महिन्यांनंतर दोन्ही संघ समोरासमोर असतील. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९ च्या विश्वचषकात भेटले होते. त्यामुळे या सामन्यावर संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सुपर -१२ मधील दोघांचा हा पहिला सामना असेल. भारत आणि पाकिस्तानला गट दोन मध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. दरम्यान भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने या सामन्यावर मोठं वक्तव्य केल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-पाकिस्तान सामन्यावर सेहवाग म्हणाला, “मी नेहमी म्हणालो आहे हा खूप मोठा खेळ आहे. हा विषय नेहमीच चर्चेत असतो की पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकला नाही आणि यावेळी तो जिंकू शकतो की नाही याविषयी चर्चाही कायम आहे. परंतु जर आपण सद्य परिस्थिती आणि या फॉर्मेटबद्दल बोललो तर मला वाटते की येथेच पाकिस्तानला नेहमीच अधिक संधी असतात कारण ते ५० षटकांच्या दीर्घ फॉर्मेटमध्ये चांगले खेळू शकत नाहीत. या फॉरमॅटमध्ये एकच खेळाडू कोणत्याही संघाला हरवू शकतो. पण तरीही, पाकिस्तान ते करू शकला नाही, २४ तारखेला काय होईल ते आपण पाहू.”

निकाल काय येणार

” २००३ वर्ल्डकप आणि २०११ वर्ल्डकपबद्दल बोलायचं झाल्यास आमच्यावर कमी दबाव होता. आमची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली होती. आम्ही कधीच मोठमोठे दावे केले नाहीत. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून संघांची स्तुती करणारे मोठमोठी विधान समोर येतात. जसं की पाकिस्तानी अँकरने सांगितलं यावेळी आम्ही इतिहास बदलू. दुसरीकडे भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करते. त्याचबरोबर दबाव चांगल्या प्रकारे हाताळते. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असतं”, असं विरेंद्र सेहवाने एबीपी न्यूजवर बोलताना सांगितलं.

पहिला वर्ल्ड कप १९७५ मध्ये एकदिवसीय प्रकारामध्ये खेळवला गेला होता. भारत आणि पाकिस्तान १९९२ मध्ये विश्वचषकात पहिल्यांदाच समोरासमोर आले होते. या विश्वचषकामध्ये पाकिस्तान विजेता होता पण इथेही त्याला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९९२ पासून सुरू झालेला पाकिस्तानच्या पराभवाचा प्रवास हा २०१९ पर्यंत पोहचला आहे. १२ वेळा पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे. या १२ पैकी ५ पराभवांचा समावेश टी -२० वर्ल्डकपमध्ये आहे. म्हणजेच ७ वेळा भारताने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup virendra sehwag big statement before india pakistan match srk
First published on: 21-10-2021 at 16:22 IST