Virat Kohli Sets New Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १८६ धावांची धडाकेबाज खेळी केली. जवळपास तीन वर्षानंतर कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा सूर गवसला. कोहलीच्या चमकदार कामगिरीमुळं त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. कोहलीने केलेल्या अप्रतिम फलंदाजीमुळं त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. हा अवॉर्ड मिळण्यासोबतच कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम याआधी जगातील कोणत्याच खेळाडूने केला नाहीय.

विराट कोहली क्रिकेटच्या तिनही फॉर्मेटमध्ये १० किंवा १० पेक्षाही जास्त वेळ ‘प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्डट जिंकणारा जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटचा हा १९ वा ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड आहे. तर वनडेत त्याने ३८ आणि टी २० मध्ये १५ वेळा हा अवॉर्ड जिंकला आहे. त्यामुळे विराटच्या नावावर एकूण ६३ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ची नोंद झाली आहे. सचिन तेंडुलकरनंतर ही अप्रतिम कामगिरी फक्त विराट कोहलीने केली आहे. सचिनच्या नावावर ६६४ मॅचमध्ये ७६ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ अवॉर्डची नोंद आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

नक्की वाचा – WTC 2023: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला, “WTC फायनलच्या तयारीसाठी आयपीएलमध्ये…”

अहमदाबादमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या अखेरच्या चौथ्या सामन्यात विराटने शतकी खेळी करून तीन वर्षांपासूनचा शतकांचा दुष्काळ संपवला. कोहलीने १८६ धावांची खेळी केल्यानं भारताला ५७१ धावांपर्यंत मजल मारता आली. २०१९ नंतर कोहलीने टेस्ट क्रिकेटमधील २८ वे शतक झळकावले. ३८४ चेंडूत कोहलीने १८५ धावांची खेळी साकारली. मागील तीन कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल नव्हती. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल मिळाल्याने विराटने या संधीचा फायदा घेतला आणि भारतासाठी धावांचा डोंगर रचला.