भारतीय संघ नवीन वर्षात श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ मंगळवारपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भिडणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल. नवीन वर्षात टीम इंडियाच्या जर्सीत बदल करण्यात आला आहे.

वास्तविक, दीर्घकाळापासून भारतीय जर्सीला प्रायोजित करणाऱ्या एमपीएलने आपले हात मागे घेतले आहेत. जर्सीवरून एमपीएलचा लोगो काढून टाकण्यात आला आहे. एमपीएलच्या जागी, नवीन किट प्रायोजक ‘किलर’ हा कपड्यांचा ब्रँड आहे.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?
Australia Postpones T20 Series Against Afganistan
ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिका पुढे का ढकलतंय?

एमपीएलला डिसेंबर २०२३ पर्यंत किट प्रायोजक होण्याचा अधिकार होता. पण त्यांनी करार पूर्ण केला नाही. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयच्या टायटल स्पॉन्सरमध्ये बदल करण्यात आला होता. पेटीएमने वेळेपूर्वी करार संपुष्टात आणल्यानंतर मास्टरकार्ड बीसीसीआयचे नवीन शीर्षक प्रायोजक बनले.

लेगस्पिनर युझवेंद्र चहलने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघाची नवीन जर्सी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये चहलशिवाय मुकेश कुमार, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह दिसत आहेत. चहलने फोटोसोबत कॅप्शन लिहिले, ‘फँटास्टिक फाइव्ह. टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे तयार.’

आजपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्याने हार्दिककडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला प्रथमच उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित १० जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा – ऋषभ पंतच्या अपघातानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याचं मोठं विधान, म्हणाला, “पंतने क्रिकेट खेळाचं….”

बीसीसीआयने गेल्या काही महिन्यांत अनेक प्रायोजक गमावले –

एमपीएल व्यतिरिक्त, बीसीसीआयने गेल्या ६ महिन्यांत अनेक प्रायोजक गमावले आहेत. बीसीसीआयचे देशांतर्गत अधिकार असलेल्या पेटीएमने मास्टरकार्डला आपले अधिकार दिले होते. याशिवाय, बायजूने बीसीसीआयला कळवले होते की तो करार संपण्यापूर्वी बाहेर जाऊ शकतो.