India vs New Zealand: लखनऊच्या अवघड खेळपट्टीवर मालिका बरोबरीत मिळविल्यानंतर निर्णायक सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि कंपनी अहमदाबादला पोहोचली आहे. अहमदाबादला पोहोचलेल्या भारतीय संघाचे खेळाडू रिसेप्शनदरम्यान खूप मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा सामना बुधवार, १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. रविवारी खेळवण्यात आलेला मालिकेतील दुसरा सामना कमी धावसंख्येचा झाला असला तरी तो खूपच रोमांचक होता. सुरुवातीला १०० धावांचा पाठलाग करणे खूप सोपे वाटले, परंतु न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना या धावांपर्यंत मजल मारणे कठीण केले. मात्र, कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अखेर विजय मिळवला.

सोमवारी भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचला. येथे संघातील खेळाडूंचे हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान, रिसेप्शनदरम्यान इशान किशन पृथ्वी शॉला खूप त्रास देताना दिसला. रिसेप्शनदरम्यान इशान पृथ्वी शॉची टोपी खेचण्याचा वारंवार प्रयत्न करत होता, पण त्याची ही युक्ती फसली.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Shikhar Virat Meet Video
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

पृथ्वी शॉने इशान किशनला तसे करण्यापासून रोखले. टीम इंडियाच्या अहमदाबादमध्ये आगमन आणि स्वागताचा हा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इशान किशन आणि पृथ्वी शॉ यांच्यातील हा चेष्टा-मस्करी आणि मजेशीर भांडणे पाहता येतील. इशान किशन आणि पृथ्वी शॉची ही स्टाईल चाहत्यांनाही पसंत पडत आहे.

विस्फोटक सलामीवीर फलंदाज

पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. तो स्फोटक फलंदाजीत माहिर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ३७९ धावा केल्या आहेत, जी रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने टीम इंडियासाठी आधीच सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. त्याच्याकडे अफाट अनुभव आहे, जो भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो.

हेही वाचा: IND vs AUS Test series: भारत दौरा सुरू होण्यापूर्वी कांगारूंची आरडाओरडा! विश्वास नाही म्हणून सराव सामना…, लावला अजब तर्क

दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सहा गडी राखून शानदार विजय नोंदवला असला तरी कर्णधार हार्दिक पंड्याने लखनौच्या खेळपट्टीवर टीका केली. त्याने ही खेळपट्टी आश्चर्यकारक आणि टी२० क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे वर्णन केले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ आठ विकेट्सवर केवळ ९९ धावाच करू शकला, तर फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही अनेक अडचणी आल्या.