scorecardresearch

Ravindra Jadeja: “पुन्हा जर्सी परिधान करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी रवींद्र जडेजा झाला भावनिक, तब्बल पाच महिन्यांनंतर पुनरागमन

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन असून गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून परतलेल्या जडेजासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. जडेजाने मालिका सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Ind vs Aus: Star player's Ravindra Jadeja get emotional statement before the test match series against Australia said it is great to wear jersey
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

Ravindra Jadeja Emotional: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा या मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. रवींद्र जडेजाने कसोटी मालिकेपूर्वी आपल्या पुनरागमनाबद्दल सांगितले आणि तो भावूक झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी विरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. गेल्या वर्षभरापासून दुखापती ही टीम इंडियासाठी मोठी समस्या बनली आहे. आपण स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा किंवा जसप्रीत बुमराहबद्दल बोलतो. दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे ब्लू आर्मीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ५ महिन्यांनंतर जडेजाचे पुनरागमन झाल्याने भारताने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

रवींद्र जडेजाने सांगितले की, टी२० विश्वचषक २०२२ पूर्वी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असती तरी तो विश्वचषक खेळू शकला नसता. रवींद्र जडेजा आशिया चषक २०२२ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडला होता, तो जवळपास ६ महिने क्रिकेटपासून दूर होता आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करत आहे. रवींद्र जडेजा म्हणाला की, “मी टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची वाट पाहत होतो. मी माझ्या गुडघ्याशी खूप संघर्ष करत होतो आणि शस्त्रक्रियेची वाट पाहत होतो. ही शस्त्रक्रिया विश्वचषकापूर्वी करायची की नंतर करायची हे मला ठरवायचे होते, डॉक्टरांनी ती लवकर करावी, असा सल्ला दिला, त्यानंतर मी निर्णय घेतला.”

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे रवींद्र जडेजा गेल्या ५ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. हा स्टार अष्टपैलू खेळाडू नवीन वर्षापर्यंत तंदुरुस्त झाला होता. पण टीम इंडियात परतण्यापूर्वी त्याचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्यात आला. त्याने एकाच सामन्यात आपली क्षमता दाखवली आणि आता तो ऑस्ट्रेलियाचा षटकार खेचण्यासाठी सज्ज झाला आहे. मागे गेलं तर जडेजाचे पाच महिने कसे गेले हे कोणालाच कळले नाही. पण परतण्यापूर्वी जडेजाने त्याचा अनुभवही शेअर केला आहे.

प्रवासात अनेक चढ-उतार आले – रवींद्र जडेजा

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जडेजा म्हणाला, “मी खूप उत्साहित आहे आणि ५ महिन्यांहून अधिक काळानंतर मी भारतीय जर्सीमध्ये आल्याने मला बरे वाटते. परत संधी मिळाली हे मी भाग्यवान आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले कारण ५ महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यास ते सोपे नसते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील फिजिओ आणि ट्रेनरने माझ्या गुडघ्यावर खूप मेहनत घेतली. रविवारी सुट्टी असल्याने त्यांनी मला वेळ दिला. एक सामना खेळल्यानंतर मी येथे आलो याचा मला आनंद आहे. मी सगळ्यांना सोबत घेऊन तयारी करत आहे, त्यामुळे छान वाटत आहे. इथून पुढे जे काही होईल ते चांगले होईल अशी आशा आहे.”

हेही वाचा: Pervez Musharraf: असे करू नका, अन्यथा युद्ध अटळ; ‘या’ कारणासाठी मुशर्रफ यांनी भारतीय कर्णधाराला दिला होता इशारा

श्रेयस अय्यरही गेल्या अनेक दिवसांपासून जखमी आहे

कसोटी संघातील अत्यंत महत्त्वाचा आणि विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत संघासोबत नाही. टीम इंडिया त्याची जागा भरू शकली नाही की लगेच श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला. हे दोन्ही खेळाडू २०२१ मध्ये संघासाठी अत्यंत महत्त्वाचे फलंदाज होते. मात्र, अय्यर दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:07 IST
ताज्या बातम्या