कर्णधार विजय झोल याने केलेले नाबाद शतक, तसेच शुभम खजुरिया, अखिल हेरवाडकर व संजू सॅमसन यांच्या शैलीदार अर्धशतकांमुळेच भारताच्या युवा संघाने श्रीलंकेच्या युवा संघाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत २ बाद ३३३ अशी शानदार सुरुवात केली. विजय झोलने नाबाद १२९ धावा करताना सॅमसन (नाबाद ७४) याच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी १६९ धावांची अखंडित भागीदारी रचली. त्याआधी  खजुरिया (५२) व हेरवाडकर (७१) यांनी सलामीसाठी ७९ धावांची दमदार भागीदारी केली.