ऑस्ट्रेलियाने दिलेले डोंगराएवढे आव्हान भारतीय संघाने सहजपणे पार केले. भारतीय संघातील युवा खेळाडूंच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारताने जयपूरची भूमी ‘विजयपूर’ ठरवली. त्यात नवे विक्रमांचीही नोंद झाली. विराट कोहलीने केवळ ५२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०० धावा फटकावल्या आणि भारतीय क्रिकेटमध्ये जलद शतक ठोकणाऱयांच्या यादीत कोहली अव्वल स्थानावर जाऊन बसला. या युवा फलंदाजाने साकालेली ही ‘विराट’ खेळी