scorecardresearch

विराट आणि राहुलच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला, “त्यांनी एकही…”

विराट आणि केएल राहुलच्या फलंदाजीवर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली.

virendra sehwag on virat and kl rahul
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातून भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ २४० धावाच करता आल्या. परिणामी २४१ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज पार केलं आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला हरवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे.

दरम्यान, भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुलच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट आणि राहुलने अत्यंत संथपणे फलंदाजी केली. त्यांनी धावा करण्यासाठी एकदाही धोका पत्करला नाही. त्यामुळे भारताला २४०च धावा करता आल्या. विराट आणि राहुलने थोडी आक्रमक खेळी केली असती तर भारत सुस्थितीत असता, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
Celebrity Cricket Turns Fight Angry Actors Producers Beat Each Other Six Injures Actress Spotted Crying Video Make Cricket Fans Mad
सेलिब्रिटी क्रिकेटच्या मैदानात गदारोळ; कलाकारांची हाणामारी, अभिनेत्री रडली.. Video पाहून लोकांचा संताप
Shoaib Akhtar Disgusting Boast Video Of IND vs PAK Says Wanted To Hurt Thought Sachin Tendulkar Died Felt Bad For MS Dhoni
“मला वाटलं सचिन मेला, मी मुद्दाम..”, शोएब अख्तरची धक्कादायक कबुली! तेंडुलकर, धोनी विरुद्ध रचला डाव
Ind vs pak 2023 Match Highlights Virat Kohli Century Gautam Gambhir Reaction Praises K L Rahul Asia Cup 2023 Point Table
IND vs PAK: कोहलीचं शतक पाहून गौतम गंभीर काय म्हणाला? के. एल. राहुलचं कौतुक आणि विराटला…

हेही वाचा- IND vs AUS final: मैदानात घुसून विराटला मिठी मारणाऱ्या तरुणाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी पॅलेस्टाईनला…”

‘क्रिकबझ’शी संवाद साधताना सेहवाग म्हणाला की, कोहली आणि राहुलने आपल्या मनात २५० धावांचं लक्ष्य ठेवून खेळत होते. पण त्यांच्या भागीदारीदरम्यान एकेरीसह आणखी काही धावा आल्या असत्या तर सन्मानजनक धावसंख्या उभारता आली असती.

हेही वाचा- IND vs AUS Final: अंतिम सामन्यात विराट आणि लाबुशेनमध्ये तणाव; एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO

“भारताच्या दोन विकेट पडल्यानंतर, कोहली आणि राहुलला वाटले की, खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे २५० धावांचं लक्ष्य मनात ठरवून ते संथ खेळू लागले. त्यांनी एकही धोका पत्करला नाही. जेव्हा दुसरा पॉवरप्ले चालू होता ज्यामध्ये पाच खेळाडू वर्तुळात होते. तेव्हा भारताला प्रत्येक षटकांत कोणताही चौकार किंवा षटकार न मारता किमान ४-५ धावा करता आल्या असत्या. दोघांपैकी एकाने आक्रमक खेळी करायला हवी होती. राहुलने १०७ चेंडू खेळून केवळ ६६ धावा केल्या. तो शेवटपर्यंत टिकून खेळला असता तर कदाचित त्याने धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी केलं असतं. पण स्टार्कने एवढा अप्रतिम चेंडू टाकला की तो (राहुल) काहीही करू शकला नाही,” असं सेहवाग म्हणाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virendra sehwag upset on virat kohli and kl rahul batting ind vs aus world cup 2023 final match rmm

First published on: 19-11-2023 at 22:24 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×