नवी दिल्ली : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर आठवडय़ाभरात भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान समोर असणार आहे. त्यातील चौथा एकदिवसीय सामना मुंबईत होईल. दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश असलेल्या या सात आठवडय़ांच्या वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला ४ ऑक्टोबरला पहिल्या कसोटीने प्रारंभ होणार आहे. यापैकी एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २७ ऑक्टोबरला पुण्यात होईल, तर चौथा सामना २९ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. कसोटी मालिका १. ४ ते ८ ऑक्टोबर राजकोट २. १२ ते १६ ऑक्टो. हैदराबाद एकदिवसीय मालिका १. २१ ऑक्टोबर गुवाहाटी २. २४ ऑक्टोबर इंदूर ३. २७ ऑक्टोबर पुणे ४. २९ ऑक्टोबर मुंबई ५. १ नोव्हेंबर थिरुवनंतपूरम ट्वेन्टी-२० मालिका १. ४ नोव्हेंबर कोलकाता २. ६ नोव्हेंबर लखनौ ३. ११ नोव्हेंबर चेन्नई