नवी दिल्ली : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर आठवडय़ाभरात भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान समोर असणार आहे. त्यातील चौथा एकदिवसीय सामना मुंबईत होईल. दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश असलेल्या या सात आठवडय़ांच्या वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला ४ ऑक्टोबरला पहिल्या कसोटीने प्रारंभ होणार आहे. यापैकी एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २७ ऑक्टोबरला पुण्यात होईल, तर चौथा सामना २९ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.

कसोटी मालिका

१. ४ ते ८ ऑक्टोबर     राजकोट

२. १२ ते १६ ऑक्टो.    हैदराबाद

एकदिवसीय मालिका

१. २१ ऑक्टोबर गुवाहाटी

२. २४ ऑक्टोबर इंदूर

३. २७ ऑक्टोबर पुणे</p>

४. २९ ऑक्टोबर मुंबई</p>

५. १ नोव्हेंबर  थिरुवनंतपूरम

ट्वेन्टी-२० मालिका

१. ४ नोव्हेंबर    कोलकाता

२. ६ नोव्हेंबर    लखनौ

३. ११ नोव्हेंबर   चेन्नई