विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत ३-१ असा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उद्यापासून ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर हा सामना रंगणार असून भारताने पहिल्या सामन्यासाठी १२ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कृणाल पांड्याला १२ जणांच्या संघात स्थान देण्यात आलं आहे.

अवश्य वाचा – धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला चांगली संधी – रोहित शर्मा

पहिल्या टी-२० साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद, युझवेंद्र चहल

अवश्य वाचा – विराट खेळत असताना प्रत्येक विक्रम धोक्यात – गावसकर