विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव जमा झाले असतांना बलाढ्य ऑस्टेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताला सुर गवसला आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले असतांना तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं आहे. भारताने ५० षटकांत सात विकेट गमावत २७७ धावा केल्या आहेत.

कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटिया यांच्या अर्धशतकी खेळाींमुळे भारताला हा पल्ला गाठता आला आहे. सुरुवातीला दोन विकेट झटपट गमावल्यावर यास्तिका भाटिया आणि मिताली राज यांनी आणखी पडझड न होऊ देता संयमी अर्धशतकी खेळी करत १५० चा पल्ला गाठून दिला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

मग त्यानंतर हरमनप्रीत कौरने ४७ धावांत ६ चौकार लगावत ५७ धावांची झटपट खेळी केल्याने भारताने २७७ चा पल्ला गाठला. तर पुजा वस्त्राकर हीने दोन षटकात आणि एक चौकार लगावत २८ चेंडून ३४ धावा चोपत हरमनप्रीत कौरला चांगली साथ दिली.

तर ऑस्ट्रेलियातर्फे डेरिक ब्राऊन हिने ३० धावांत ३ बळी मिळवले. भारतीय फलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी फिकी पडलेली बघायला मिळाली. दरम्यान २७७ धावांचा पाठलाग करतांना ऑस्टेलियाने आक्रमक सुरुवात केली असून अवघ्या सात षटकांत ५० धावांचा पल्ला पार केला आहे. भारताने हा सामना गमावला तर पुढील दोन सामन्यांत चांगल्या फरकाने विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल.