टोक्यो ऑलिम्पिक संपले आणि सर्व भारतीय खेळाडू मायदेशी परतले. घरी परतल्यानंतर, पदक विजेत्यांचा सन्मान आणि स्वागत केले जात आहे आणि त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. पण या सर्वांमध्ये भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाट देखील सतत चर्चेत आहे. टोक्योहून परतल्यानंतर, तिला भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) अनुशासनासाठी तात्पुरते निलंबित केले आणि १६ ऑगस्टपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला.

या सर्व टीकेनंतर विनेश फोगाटने संपूर्ण प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. तिने फेडरेशनवर प्रश्न उपस्थित केले असून तसेच इंडियन एक्सप्रेसमध्ये आपली बाजू मांडली आहे. विनेश म्हणाली, ”पदक गमावताच लोकांनी मला निर्जीव मानले. सध्या माझ्या मनात दोन प्रकारचे विचार चालू आहेत. एक विचार म्हणतो की मी आता कुस्तीपासून दूर जावे, तर दुसरा विचार असा आहे, की न लढता दूर राहणे हा त्याचा सर्वात मोठा पराभव असेल. असे दिसते की मी स्वप्नात झोपले आहे. गेल्या आठवड्यापासून माझ्या आत बरेच काही चालू आहे. मला पूर्णपणे वेगळे वाटत आहे.”

हेही वाचा – भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधाराची निवृत्ती, अमेरिकेकडून खेळण्याची शक्यता

विनेशने फेडरेशनचे आरोप फेटाळत आपली बाजू मांडली. प्रत्यक्षात संघाने म्हटले होते की, विनेशने आपल्या सहकारी कुस्तीपटूंसोबत राहणे आणि प्रशिक्षण घेणे नाकारले होते. यावर ती म्हणाली, ”भारतीय खेळाडूंची सतत करोना चाचणी होत होती आणि माझी चाचणी झाली नव्हती. मला फक्त त्यांना सुरक्षित ठेवायचे होते. नंतर मी सीमासोबत प्रशिक्षणही घेतले, मग त्यांनी कसा आरोप केला, की मला संघासोबत राहायचे नाही?”

हेही वाचा – “७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

“मी पूर्णपणे तुटलेय”

टोक्यो ऑलिम्पिकमधील पराभवामुळे विनेश अत्यंत निराश झाली आहे. ती म्हणाली, ”मला माहीत नाही की मी कधी मॅटवर परतेन. कदाचित मी परत येणार नाही. मला वाटते की तुटलेल्या पायाने मी बरी होते. मला काहीतरी योग्य करायचे होते. आता माझे शरीर तुटलेले नाही, पण मी पूर्णपणे तुटले आहे.”

विनेश टोकियो टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाची प्रबळ दावेदार होती, परंतु उपांत्यपूर्व फेरीत बेलारूसी खेळाडू व्हेनेसाकडून पराभूत झाल्यामुळे तिला बाहेर पडावे लागले.