वृद्धिमान साहा मैदानावरील आपल्या शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला जातो. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तो काहीनाकाही कारणामुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. याच दरम्यान, पत्रकार बोरिया मजुमदार यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप साहाने केला होता. शिवाय त्याने यासंदर्भातील सोशल मीडिया चॅटही प्रसिद्ध केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मजुमदारवर कारवाईदेखील केली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. आता सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असतानाच साहा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा संपल्यानंतर होणाऱ्या रणजी करंडक बाद फेरीतील सामन्यांपूर्वी त्याने बंगालचा संघ सोडण्याचे संकेत दिले आहेत. साहाने बुधवारी (२५ मे) रात्री संघाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा वृद्धिमान साहा वादात सापडला होता, तेव्हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) सहसचिव देवव्रत दास यांनी पत्रकारांसमोर साहाच्या संघाप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाने रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कॅबचे सहसचिव देवव्रत दास नाराज झाले होते. त्यांनी साहाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारतीय संघात नसताना साहाने रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळण्यास काहीच हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. जर तो नकार देत आहेत तर बंगालप्रती त्याची कोणतीही जबाबदारी नाही, असे आपण गृहीत धरले पाहिजे का? असेही दास म्हणाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wriddhiman saha leaves cab whatsapp group wife told the reason vkk
First published on: 28-05-2022 at 16:21 IST