२०२३ बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या ४ पैकी पहिली कसोटी भारताने जिंकली आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने गोलंदाजीने धुमाकूळ घातला असला तरी मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनीच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत पाठवण्यास सुरुवात केली. शमीने याआधी दुसऱ्या डावात दोन बळी घेतले होते. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, शमीने भारतीय संघाच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व सर्व फॉरमॅटमध्ये केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन विकेट्स घेतल्यानंतर शमी म्हणाला होता, “संघात आल्यानंतर माझ्या भूमिकेत बदल झालेला नाही. फक्त फिटनेस आणि डाएटवर मी योग्य लक्ष देत असतो.”

२०१८ मध्ये त्याच्या तंदुरुस्तीमुळेच त्याला प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गमवावे लागलेहोते. तो त्याच्या कारकिर्दीत अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. रवी शास्त्री यांनी समजावल्यावर शमीने आपला विचार बदलला आणि त्याच्या फिटनेसवर काम करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एक महिना घालवला. भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी नुकताच याचा खुलासा केला.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

हेही वाचा: WPL RCB Mentor: सानिया मिर्झाची नवी इंनिग! पतीच्या पाऊलावर पाऊल ठेवत RCBच्या संघात मिळाली विशेष जबाबदारी

मोहम्मद शमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता

भरत अरुण म्हणाले, “२०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी फिटनेस चाचणी झाली आणि त्यात शमी नापास झाला. त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. त्याने मला कॉल केला आणि सांगितले की त्याला माझ्याशी बोलायचे आहे. मी तिला माझ्या खोलीत बोलावले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गडबड होती. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर परिणाम झाला. तो मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ होता.”

पत्नी हसीन जहाँने अनेक आरोप केले होते

हा तोच काळ होता जेव्हा शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. लॉकडाऊन दरम्यान, शमीने इरफान पठाणसोबत इंस्टाग्राम लाइव्हवर कबूल केले की त्याने आत्महत्या करण्याचा विचारही केला होता.

तू क्रिकेट खेळला नाही तर दुसरं काय करणार?

भरत अरुण म्हणाले, “शमी माझ्याकडे आला आणि म्हणाला, मला खूप राग आला आहे आणि मला क्रिकेट सोडायचे आहे. मी लगेच शमीला रवी शास्त्रींना भेटायला घेऊन गेलो. आम्ही दोघे त्याच्या खोलीत गेलो आणि मी म्हणालो, ‘रवी, शमीला काही बोलायचे आहे. रवीने विचारले काय आहे. शमीने त्याला तेच सांगितले की मला क्रिकेट खेळायचे नाही. आम्ही दोघांनी विचारले, तू क्रिकेट नाही खेळणार तर काय करणार? तुला अजून काय माहित आहे, वेगळं काही येत का?”

हेही वाचा: Chetan Sharma: आणखी एक धक्कादायक खुलासा! टीम इंडियाचा कर्णधार सिलेक्टर्सच्या घरी सोफ्यावर ठरवला जातो?  

राग व्यक्त करा परंतु फिटनेसकडे दुर्लक्ष करू नका

भरत अरुण म्हणाले, “म्हणून रवी म्हणाला तू रागावलास हे बरे झाले. तुमच्यासोबत घडलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण तुमच्या हातात चेंडू आहे. तुमचा फिटनेस खराब आहे. तुमच्या अंतःकरणात जो काही राग आहे तो बाहेर काढा आणि तुम्ही तुमच्या शरीरावर फोकस करा. आम्ही तुम्हाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवणार आहोत आणि तुम्ही तेथे ४ आठवडे राहावे अशी आमची इच्छा आहे. तुम्ही घरी जाणार नाही फक्त NCA मध्ये जा.”

भरत अरुण पुढे म्हणाले, “शमीलाही हे अनुकूल ठरले कारण त्याला कोलकात्याला जाण्यात अडचण आली होती म्हणून त्याने एनसीएमध्ये ५ आठवडे घालवले. मला तो फोन आठवतो जेव्हा तो मला म्हणाला, ‘साहेब, आता मी घोड्यासारखा तंदुरस्त झालो आहे. तुला पाहिजे तितके मला चालवा ५ आठवडे त्याने तिथे घालवले. फिटनेसवर काम केल्याने त्याचा कसा फायदा होऊ शकतो याची जाणीव त्याला झाली.”

हेही वाचा: Chetan Sharma Sting Operation: चेतन शर्मा क्लीनबोल्ड? खळबळजनक खुलाशांनी BCCI हादरले, सचिव जय शाह कारवाईच्या तयारीत

एनसीएमध्ये वेळ घालवल्याचा फायदा मोहम्मद शमीला मिळाला

वाटाघाटी आणि NCA मध्ये घालवलेले आठवडे निर्णायक ठरले. शमी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आणि २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटींमध्ये १६ विकेट्स घेऊन दुसरा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १६ विकेट्स घेतल्या होत्या. शमीच्या पुनरागमनानंतर कसोटीतील गोलंदाजीची सरासरीही कमी झाली. या घटनेपूर्वी ३० कसोटींमध्ये शमीची सरासरी २८.९० होती. यानंतर ३१ कसोटी सामन्यांमध्ये त्याची गोलंदाजीची सरासरी २५.५२ इतकी घसरली.