राजेंद्र श्रीकृष्ण भट

सर्वच वेलभाज्यांची मुळे उथळ असतात. साधारण साडेनऊ इंच खोल वाढतात. गच्चीवर वाफे तयार करून किंवा मोठय़ा कुंडय़ांमध्ये लावून घरगुती वापरापुरते उत्पन्न घेणे शक्य असते. वाफ्यातील किंवा कुंडीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. कुंडी किंवा वाफ्याबाहेर येईल एवढे पाणी घालू नये. पाणी शक्यतो संध्याकाळी घालावे. या वेलीचे आयुष्य संपले की ती जमिनीलगत कापावीत. त्यामुळे मुळे मातीतच कुजतात आणि माती सुपीक होते. काही वेळा पुन्हा पाने येऊन वेल तयार होते. आधी कापलेल्या वेलीचे लहान तुकडे करावेत आणि ते मातीवरच टाकावेत. त्यामुळे मातीची सुपीकता वाढते.

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

काकडी आणि ढोमसे – यांचे फळ ४५ ते ५० दिवसांत मिळते. हंगामानुसार दोन-तीन दिवसांनी फळांची तोडणी करावी. साधारण एक ते १२ फळे मिळतात. चौथे-पाचवे फळ बीसाठी ठेवावे. १०-१२ फळे लागल्यानंतर वेलीची उत्पादन देण्याची क्षमता संपते.

शिराळी, पडवळ – यांना साधारण ५०-६० दिवसांत फळे येऊ लागतात. या वेलींबाबत एक नियम आहे. पहिले फळ येण्यास जेवढा कालावधी लागतो, साधारण तेवढाच कालावधी पुढे उत्पादन मिळत राहते.

दुधी, कारले – या वेलींना ५०-६० दिवसांत फळे येऊ लागतात.

घोसाळी – ही वेल वर्षभर टिकवता येते. तिची वाढ जास्त असते. साधारण ५०-६० दिवसांत फळे येऊ लागतात.