जयदेव डोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्ल मार्क्‍स आणि महात्मा गांधी हे दोघे सोडले तर व्यक्तीच्या नावे राजकीय तत्त्वज्ञान अथवा वाद (इझम) तयार झालेला नाही. मार्क्‍सच्या परंपरेत लिऑन ट्रॉट्स्की, मानवेंद्रनाथ रॉय, माओ झेदाँग, व्लादिमीर लेनिन अशा नेत्यांची विचारधारा ‘वाद’ म्हणून वर्णिली जाऊ लागली. गांधीजींना मानणारे जयप्रकाश नारायण व डॉ. राममनोहर लोहिया हे नेते मार्क्‍सचेही अनुयायी होते. लोहियांना मानणाऱ्यांनी एक ‘लोहियावाद’ तयार केला. ‘समाजवादी- लोहियावादी’ असणारा एक मोठा पक्ष भारताने पाहिला. नेल्सन मंडेला, फिडेल कॅस्ट्रो, हो चि मिन्ह, अब्दुल नासेर, द गॉल, जोमो केन्याटा, जवाहरलाल नेहरू असे लोकनेते त्यांचे कार्य त्यांच्या नावे बंद अशा चौकटीत उभे करू शकले नाहीत. कारण त्यांची मुळे अन्य तत्त्वज्ञानात रुजलेली होती. इतकेच काय, आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते ना वाजपेयीवादी असतात ना दीनदयाळ उपाध्यायवादी, ना देवरसवादी! परंतु सावरकरवाद म्हणायला पसरला असला, तरी हिंदू महासभेपेक्षा तो कोणत्या मुद्दय़ांवर वेगळा होता, हे एक गूढच आहे. सुभाषचंद्र बोस यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ पक्ष काढला. परंतु त्यांचे अनुयायी ‘बोसवाद’ पसरवू शकले नाहीत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about ambedkarwadapudhil navi avhane by milind kasabe book
First published on: 30-12-2018 at 01:23 IST