अनेकांच्या नावडतीच्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे मुळा. तीक्ष्ण चवीमुळे आणि उग्र वासामुळे ती खाण्यास अबाल-वृद्धांपासून सारेच कंटाळा करतात. परंतु. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्ये अत्यंत गुणकारी गुणधर्म आहेत. त्यामुळे आज मुळ्याची पानं खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. १. अन्नपचन सुरळीत होते. २. त्वचा उजळते. ३. मधुमेहींसाठी गुणकारी. ४.अशक्तपणा दूर होतो. ५. हिमोग्लोबिनची पातळी वाढते. ६. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात ७. कर्करोगासारख्या आजाराचा प्रतिकार करण्यास मदत होते. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)