१५ सप्टेंबर रोजी देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो. या दिवशी महान भारतीय अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्म झाला होता. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते. भारताला अधिक आधुनिक बनवण्यात त्यांनी योगदान दिले होते. भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने केले सन्मानित एम. विश्वेश्वरय्या यांना १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. याच कारण त्यांच्या प्रयत्नामुळे कृष्णराज सागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल ऑइल अँड सोप फॅक्टरी, म्हैसूर युनिव्हर्सिटी, बँक ऑफ म्हैसूर येथे पूर संरक्षण प्रणाली विकसित झाली होती. याशिवाय हैदराबाद शहराच्या रचनेचे श्रेय डॉ विश्वेश्वरय्या यांना जाते. त्यांनी पूर संरक्षण प्रणाली विकसित केली होती.विशाखापट्टणम बंदराच्या समुद्राच्या धूपपासून संरक्षणासाठी एक विशेष योजना तयार करण्यात आली. भारत सरकारने १९६८ मध्ये एम विश्वेश्वरय्या यांच्या वाढदिवसानिमित्त अभियंता दिन घोषित केला. (हे ही वाचा: Hindi Divas: ‘या’ महाविद्यालयाने हिंदीत सुरु केलेलं इंजिनिअरिंग, नंतर केलं बंद; जाणून घ्या कारण) असा होता प्रवास विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर (कर्नाटक) च्या कोलार जिल्ह्यात झाला. विश्वेश्वरय्या यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण म्हैसूरमध्येच पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी बेंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विश्वेश्वरय्या यांनी १८८१ मध्ये बीए परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. यानंतर, म्हैसूर सरकारच्या मदतीने त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच १८८३ च्या LCE आणि FCE परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची नाशिकमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती केली. विश्वेश्वरय्या यांनी मुसा आणि ईसा नावाच्या दोन नद्यांच्या पाण्याला बांधण्याची योजना तयार केली. त्यानंतर त्यांची म्हैसूरचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली. १९४७ मध्ये ते अखिल भारतीय उत्पादन संघटनेचे अध्यक्ष झाले. पंतप्रधान मोदींचे ट्विट २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींनी देशातील अभियंत्यांचे कौतुक केले. अभियांत्रिकीचे प्रतिभाशाली एम विश्वेश्वरय्या यांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी ट्विटरचा आधार घेतला. त्यांनी लिहिले, "अभियांत्रिकी दिनानिमित्त, मी आपल्या मेहनती अभियंत्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या निपुणतेचे तसेच समर्पणाचे कौतुक करतो. राष्ट्र उभारणीत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे."