कोणताही गोड पदार्थ करायचा असला की साधारणपणे गुळ, साखर यांचा वापर सर्रास केला जातो. परंतु, कोणत्याही पदार्थाचं अतिरिक्त सेवन योग्य नाही असं म्हटलं जातं. तेच गोड पदार्थांच्या बाबतीतही लागू होतं. कोणताही गोड पदार्थ जास्त खाल्ला की त्याचा त्रास हा जाणवूच लागतो. त्यामुळे गोड पदार्थ हे कायम नियंत्रणात खावे. मात्र, या सगळ्यात खडीसाखर ही अशी आहे ज्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळे खडीसाखर खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात. १. जुनाट खोकला असेल तर खडीसाखर खाल्ल्यामुळे तो बरा होतो. २. हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. ३. उन्हाळ्यात अनेकांचा घोळणा फुटतो म्हणजे नाकातून रक्त येते. त्यावेळी खडीसाखर खाल्ल्यास रक्त थांबतं. ४. पचनसंस्था सुधारते. ५. तोंडाचे इनफेक्शन कमी होते ६. मरळगळ दूर होते. ७. त्वचेचा पोत सुधारतो. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)