गेल्या तीन वर्षांत देशातील एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पण त्याचबरोबर काही राज्ये एचआयव्ही संसर्गाची नवी ठिकाणे म्हणून सामोरी आली आहेत, असे संसदेत आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

ते म्हणाले, की इतर राज्यात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असून मेघालय, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तीन वर्षांत एकूण एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये २,००,४६५ जणांना एचआयव्ही बाधा झाली. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण १,९३,१९५ होते. तर २०१७-१८ मध्ये ते १,९०,७६३ झाले. तीन वर्षांत महाराष्ट्रात एचआयव्हीचे प्रमाण जास्त असून तेथे २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार  २८,०३० रुग्ण आहेत. मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यात एचआयव्हीचा प्रादुर्भाव वाढत आहे कारण तेथे गर्भवती महिलांमध्ये व जोखमीच्या गटात (वेश्या व इतर) एचआयव्हीचे प्रमाण जास्त आहे. देशभरात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असताना या तीन राज्यांत मात्र एचआयव्हीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.  महाराष्ट्रातील  परिस्थितीही फार चांगली नाही. काही वेळा वापरलेल्या सुया वापरल्यामुळेही या विषाणूची लागण होते, तर अनेकदा असुरक्षित लैंगिक संबंधातून त्याची लागण होताना दिसून येते.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता