पृथ्वीचा सर्वाधिक भाग ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेला आहे त्याचप्रमाणे शरीराच्याही अधिक भागात पाणी असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची सफाई करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपण दिवसभरात जितके पाणी पिऊ तितके चांगलेच असते. सामान्यपणे प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र हे पाणी कसे आणि दिवसातील कोणत्या वेळेस प्यायलेले चांगले हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
१. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने साफ होण्यास फॅटस कमी होण्यास मदत होते.

२. पाणी उभे राहून पिणे चांगले नाही. बसून प्यावे.

bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

३. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. दर थोडा वेळाने दोन ते तीन घोट पाणी प्यावे.

४. आंघोळ झाल्यावर दररोज १ ग्लास पाणी प्यावे. आंघोळीने काही वेळा थकल्यासारखे होते. तसेच ब्लडप्रेशरची तक्रार उद्भवत नाही.

५. जेवणानंतर लगेच पाणी न पिता जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यावे. यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासाने पाणी प्यावे .

६. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयरोगापासून सुटका मिळू शकते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे.