रमजान ईदनंतर बरोबर ७० दिवसांनी येणारा बकरी ईद हा दिवस मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रमजान ईदनंतरचा मोठा सण म्हणून हा दिवस ओळखला जातो. मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करतात तसेच एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छाही दिल्या जातात. यादिवशी घरोघरी शेवया, मिठाई आणि पक्वान्न बनवली जातात आणि कुटुंबातील मंडळी एकत्र मिळून याचा आस्वाद घेतात. या दिवशी बकरीचा बळी देण्याची प्रथा मागील अनेक वर्षांपासून आहे. आता बकरीचा बळी का दिला जातो? तर त्यामागे एक गोष्ट सांगितली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजरत इब्राहिम यांना देवाने आपल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. देवाने सांगितले असल्याने तेही ही गोष्ट करण्यास तयार झाले होते. या मुलाचे नाव इस्माईल असे होते. पोटचा मुलगा असल्याने इब्राहिम यांना तो अतिशय लाडका होता. पण देवाचा आदेश पाळणे गरजेचे असल्याने त्यांनी ही अतिशय कठीण गोष्ट मान्य केली. आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झालेल्या हजरत इब्राहिम यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातात सुरा देण्यात आला. मात्र त्याचवेळी देवाने त्यांना खुश करायचे ठरवले. आणि प्रत्यक्ष बळी देण्याच्या वेळी मुलाच्या जागी एक बकरा आणून ठेवला. देवाच्या या कृतीमुळे इब्राहिम देवावर खूपच खुश झाला. कारण आपला मुलगा त्याला कायमसाठी मिळणार होता. त्यामुळे तेव्हापासून या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of bakari eid celebration
First published on: 22-08-2018 at 09:05 IST