भारती एअरटेलने सोमवारी २६ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या विविध सेवांसाठी दूरसंचार ग्राहकांसाठी दरात वाढ केली असून, हा निर्णय “आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडेल” साठी आहे असं सांगितलं आहे. कंपनीने प्रीपेड टॅरिफ २०-२५ टक्क्यांनी आणि डेटा टॉप-अप प्लॅनमध्ये २०-२१ टक्क्यांनी वाढ केली आहे.

“भारती एअरटेलने नेहमी मेंटेन ठेवले आहे की मोबाइल सरासरी महसूल प्रति वापरकर्ता (ARPU) २०० रुपये आणि शेवटी ३०० रुपये असणे आवश्यक आहे, जेणेकरून भांडवलावर वाजवी परतावा मिळू शकेल ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडेलला अनुमती मिळेल.” कंपनीने एका निवेदनात, दूरसंचार उद्योगाच्या ग्राहकांकडून व्युत्पन्न केलेल्या महसुलाचा संदर्भ दिला आहे.

काय म्हणाले कंपनीचे अध्यक्ष?

भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ऑगस्टमध्ये टेलिकॉम उद्योगासाठी दरवाढ हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले होते. “आम्ही आमचे काम मर्यादित पद्धतीने केले आहे, आमचा संयम संपला आहे आणि आम्ही सर्व वेळ आउटलाअर होऊ शकत नाही,” मित्तल यांनी कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या कॉलनंतर सांगितले.

आज सकाळी एअरटेलच्या निवेदनात असे म्हटले आहे की दरवाढीमुळे पायाभूत सुविधांमध्ये “भरीव गुंतवणूक” (substantial investments) होईल आणि भारतात ५ जी स्पेक्ट्रम आणण्यात मदत होईल.