शेतीतील आधुनिकीकरणामुळे जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश मध्ये केली जाणारी बदामाची शेती आता महाराष्ट्रातही शक्य होत आहे. बदामाचे एकंदरीत बाजारभाव बघता व्यवयसायिक स्तरावर बदाम शेती केल्यास आर्थिक उत्पन्न वाढू शकते. बदामाची बाजारात मागणी कायम असल्याने या पिकाचे उत्पादनही हातोहात विकले जाते. याशिवाय बदाम २४० दिवस सहज साठवून ठेवता येतो त्यामुळे शेतमालाची साठवणूक करण्याचा कोणताही त्रास शेतकऱ्यांना होत नाही. या शेतीसाठी बदामाच्या काही विकसित प्रजाती वापरण्याचा सल्ला शेती तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ज्याविषयी आपण आज या लेखातून माहिती घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉन-पॅरील, कॅलिफोर्निया पेपर शेल, मर्सिड, IXL, प्रिमोर्स्की, पीअरलेस, कार्मेल, थॉम्पसन, प्राइस, बट्टे, मॉन्टेरे, रुबी, फ्रिट्झ,शालिमार, मखदूम, वारिस, प्रनायाज, प्लस अल्ट्रा, सोनोरा या व अशा काही बदामाच्या प्रजाती सर्वाधिक उत्पादन मिळवून देतात. बदाम लागवडीच्या बाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे पाणी किती लागणार? कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार बदाम लागवडीत अन्य पिकांइतकेच पाणी लागते. मात्र बदामाचे झाड हे एकदा पूर्णपणे वाढल्यावर भविष्यात त्याला अधिक पाणी देण्याची गरज नसते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Almond farming in maharashtra one tree produces for 50 years learn about new almond varieties svs
First published on: 03-08-2022 at 11:17 IST