Piles home remedies: आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर शतकानुशतके केला जात आहे. हजारो वर्षांपासून गंभीर आजारांवरही औषधी वनस्पतींचा वापर करून नैसर्गिकरीत्या उपचार केले जात आहेत. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने वात, पित्त व कफ यांचे संतुलन राखण्यास मदत होते, ज्यामुळे आजार रोखता येतो. काही औषधी वनस्पती केवळ उपचारच देत नाहीत, तर आजार होण्यापूर्वीच रोखतात. काही औषधी वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात आणि शरीराला विषमुक्त करू शकतात.
त्रिफळा हे तीन फळांच्या मिश्रणापासून बनवलेले आयुर्वेदिक औषध आहे. आवळा, हरितकी (हिरडा) व बेहडा या तीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, ज्याची तीन फळे त्रिफळा म्हणून ओळखली जातात. त्रिफळा हे एक असे आयुर्वेदिक औषध आहे, जे पचनशक्ती सुधारते अन् बद्धकोष्ठतेवर उपचार करते, मूळव्याधीची लक्षणे नियंत्रित करते आणि रक्त शुद्ध करते. तुम्ही ती पावडर किंवा कॅप्सूल स्वरूपात घेऊ शकता.
प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सुभाष गोयल म्हणतात की, त्रिफळा हे मूळव्याधीग्रस्तांसाठी वरदान आहे. १:२:४ च्या प्रमाणात त्रिफळा घ्या. एक भाग हरडा दोन भाग बेहडा व चार भाग आवळा पावडर मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणाचा दररोज एक चमचा सेवन करा. त्रिफळा सेवन केल्याने मूळव्याध कशी नियंत्रित होते आणि बद्धकोष्ठतेवर कसा उपचार होतो हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
मूळव्याध व बद्धकोष्ठतेवर उपचारास उपयुक्त
मूळव्याध हा बद्धकोष्ठतेमुळे होणारा आजार आहे. त्रिफळा मुळापासून बद्धकोष्ठता दूर करते. ते नैसर्गिक रेचक म्हणून काम करते. त्यामुळे मल मऊ होऊन, बाहेर काढणे सोपे होते. या औषधी वनस्पतीचे सेवन केल्याने आतडी स्वच्छ होतात आणि पचनसंस्था सक्षम राहते. त्रिफळ्याचा परिणाम मूळव्याधीच्या मुळावर परिणाम होतो. त्याचे सेवन जळजळ नियंत्रित करते. दाहकविरोधी गुणधर्मांनी समृद्ध त्रिफळा मूळव्याधीमुळे येणारी सूज, जळजळ व वेदना नियंत्रित करते. त्रिफळ्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील विषाक्त घटक काढून टाकले जातात. मूळव्याध रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत सेवन करावे.
हे मिश्रण शरीराला डिटॉक्सिफाय करते
त्रिफळा हे तीन फळांचे मिश्रण आहे, जे शरीराच्या प्रत्येक कोपऱ्याला स्वच्छ करते. त्रिफळामध्ये असलेले हरडा (मायरोबालन) व बेहडा (बहेडा) हे दोन पदार्थ आतड्यांतील अशुद्ध घटक, बाहेर काढतात. ही औषधी वनस्पती मल मऊ करून, शरीराला बद्धकोष्ठतेपासून मुक्त होते, ज्यामुळे शरीरातून विषाक्त पदार्थ नियमितपणे बाहेर पडतात. ही औषधी वनस्पती यकृतातून जमा झालेल्या अशुद्धतेचे शुद्धीकरणदेखील करते. त्याचे सेवन केल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
ते रक्त शुद्ध करते आणि त्वचा उजळवते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले त्रिफळा शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकते. ते सेवन केल्याने चयापचय वाढतो आणि वजन कमी करणे सोपे होते. ते सेवन केल्याने पचन व चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडण्यास मदत होते. शरीराला विषमुक्त करण्यासाठी, अर्धा किंवा एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या.
