Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नेहमीच आपल्या धोरणांद्वारे मानवी समाजाचे कल्याण केले आहे. आचार्य चाणक्यजी हे त्यांच्या धोरणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणांच्या जोरावर नंद वंशाचा नाश केला आणि एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्य मगधचा सम्राट बनवलं. त्यामुळे आचार्य चाणक्यांची धोरणे आजच्या काळातही समर्पक मानली जातात. असं म्हटलं जातं की जो कोणी आचार्य चाणक्यजींच्या धोरणांचे पालन करतो, त्याला आपल्या जीवनात नेहमी यश मिळतं.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात संपत्ती, धन, पत्नी आणि मैत्री यासह सर्व विषयांवर सूचना दिल्या आहेत. आचार्य चाणक्यजींनीही अशा काही कामांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि व्यक्तीच्या घरात गरीबी वाढू लागते. आचार्य चाणक्यांच्या मते, अशा लोकांनाच आपल्या जीवनात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जे नेहमी चांगल्या सवयी लावून पुढे जातात. असे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक ध्येय साध्य करतात.

आणखी वाचा : Lunar Eclipse 2021: 19 नोव्हेंबरच्या चंद्रग्रहणादरम्यान काय करावे आणि करू नये ?

आचार्य चाणक्य नुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर हे काम विसरूनही करू नका-


एखाद्याचा विश्वासघात करणे: आचार्य चाणक्य यांच्या मते, काही लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणाचीही फसवणूक करण्यापासून मागे राहत नाहीत. कपटी माणसाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कधीच मिळत नाही. अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी पैशाची कमतरता असते. कधी कधी तर असं होतं की त्यांच्या जवळचे लोकही त्यांची साथ सोडून देतात. अविश्वासू लोकांची सत्यता कळल्यानंतर लोक त्यांच्यापासून दुरावतात.

आणखी वाचा : Chandra Grahan 2021: काही दिवसांनी होणार आहे चंद्रग्रहण, या ४ राशीच्या लोकांनी सावधानता बाळगावी

अहंकारी : आचार्य चाणक्य यांच्या मते अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. गर्विष्ठ व्यक्तीवर देवी लक्ष्मी कधीही कृपा करत नाही. धनाची देवी लक्ष्मी गर्विष्ठ लोकांची साथ देत नाही. म्हणून चाणक्यजी लोकांना अहंकार टाळण्याचा सल्ला देतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, अहंकारामुळे लोकांना जीवनात अनेकदा संघर्ष करावा लागतो.