आचार्य चाणक्यांची धोरणे खूप उपयुक्त आहेत. कोणतीही व्यक्ती त्यांच्या धोरणांचा अवलंब करतो, त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. या धोरणांचा अवलंब करणाऱ्या व्यक्तीची नेहमीच भरपूर प्रगती, संपत्ती आणि आनंद मिळतो. आचार्य चाणक्यांच्या धोरणांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्य नंद वंशाचा सम्राट बनला आणि त्याच्या अनेक शत्रूंचा पराभव करू शकला. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भरपूर यश मिळते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत १. आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला नेहमी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल. तर कधीही अन्न वाया घालवू नका. अन्न वाया गेल्याने माता अन्नपूर्णा रागावते आणि ती देवी लक्ष्मीचे रूप आहे. २. जे लोक नेहमी एकमेकांना मदत करतात, जे दयाळू असतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. यासोबतचं जे लोक त्यांच्या पैशाचा चांगला वापर करतात आणि त्यांच्या मनात इतरांबद्दल कृतज्ञतेची भावना असते. आणखी वाचा : शनीच्या राशीत शुक्राचा प्रवेश, ‘या’ ४ राशींसाठी बनवत आहे ‘धन योग’! ३. ज्या घरांमध्ये प्रेमाचे वातावरण असते त्या घरावर देवीलक्ष्मीची कृपा असते. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांना नेहमी प्रेम आणि आदर दिला पाहिजे. कधीही भांडण करू नका, नाहीतर घरात गरिबी येण्यास वेळ लागणार नाही. ४. जेव्हा अनावश्यक खर्च होत नाही आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा कमावलेला पैसा उपयोगी ठरतो. त्यामुळे नेहमी आरामदायी जीवन जगण्यासाठी बजेट बनवून पैसे खर्च करा आणि अनावश्यक खर्च करू नका. आणखी वाचा : ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत करणार प्रवेश गोचर, जाणून घ्या कोणत्या राशींना होणार फायदा ५. जे लोक मेहनत करतात त्यांच्यांवर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो. त्या लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते.