आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्याप्रकारे घर्षण, कापणे, उष्णता आणि मार सहन केल्यानंतर सोन्याची खरी परख होते. त्याचप्रकारे व्यक्तीची ओळख त्याच्या गुणांनी केली जाते. व्यक्तीचे हेच गुण त्याचं आचरण दर्शवतात. यात त्यांनी व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींचा उल्लेख केलाय, ज्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे या वाईट सवयींपासून सर्वांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. असं म्हटलं जातं की वेळ कोणासाठी थांबत नाही. गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे वेळेचे मूल्य समजले पाहिजे. आयुष्यात फक्त तेच लोक यशस्वी होतात ज्यांना वेळेची किंमत समजते. कोणतंही ध्येय तेव्हाच साध्य होतं जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर योग्य निर्णय घेते. जे लोक वेळेचा चांगला वापर करतात, ते आपले ध्येय सहजपणे साध्य करू शकतात. अशा लोकांवर आई लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti the blessings of mother lakshmi on such people who stay away from these things prp
First published on: 15-10-2021 at 15:48 IST