तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात खूप शुभ मानलं जातं. तुळशीला देवी लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. धर्म, ज्योतिष याशिवाय वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ज्या घरात तुळशीचे वास्तव्य असतं, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी नांदत असते आणि तिची रोज पूजा केली जाते. याशिवाय तुळशीच्या रोपामुळे वातावरणात सकारात्मकता येते. त्यामुळे प्रत्येक घरात योग्य ठिकाणी तुळशीचे रोप लावणे उत्तम मानलं जातं.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?

कृपया या नियमांचे पालन करा

तुळशीचे रोप लावताना त्याच्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. तसंच शूज आणि चप्पल घालून तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीचे रोप अतिशय पवित्र आहे, आंघोळीनंतर तिला नेहमी स्पर्श करावा. याशिवाय रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला पाणी देऊ नये. या दिवशी तुळस भगवान विष्णूसाठी उपवास ठेवतात आणि जल अर्पण करून उपवास तोडतात. याशिवाय रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा.

तुळशीमधील हे बदल दर्शवतात धोक्याची घंटा

घरात लावलेले तुळशीचे रोप घरातील लोकांना अनेक संकटांपासून तर वाचवतेच शिवाय आगामी शुभ आणि अशुभ घटनांचे संकेतही देते. त्यामुळे तुळशीच्या रोपामध्ये अचानक बदल होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

तुळशीचे रोप सुकवणे : घरातील हिरवी तुळस अचानक सुकली तर काही संकट येण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी सावध होऊन वाळलेल्या तुळशीचे रोप ताबडतोब काढून पुन्हा लावावे. तसेच भगवान विष्णूची पूजा करावी.

आणखी वाचा : Chanakya Niti : अशा लोकांकडे लक्ष्मी कधीच येत नाही, चाणक्य नीतिमध्ये सांगितल्या आहेत ‘या’ गोष्टी

नवीन रोप गळून पडणे : घरात नवीन तुळशीचे रोप लावले आणि ते दोन दिवसात सुकून गळत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे. पितृदोषामुळे घरात भांडणेही होतात, ही दोन्ही चिन्हे दिसल्यास पितृदोष दूर करण्याचे उपाय ताबडतोब करा.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

तुळस अचानक हिरवी होणे : तुळशीचे रोप अचानक वाढून खूप हिरवे झाले तर ते खूप शुभ असते. हे काही आनंदी कार्यक्रमाची पूर्वसूचना आहे.