मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण जितके धोकादायक आहे तितकेच रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होणे ही चिंताजनक परिस्थिती निर्माण करू शकते. तज्ज्ञांच्या मते, आपले शरीर अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते आणि त्याचा शरीरात ऊर्जा म्हणून वापर करते, परंतु जेव्हा शरीरात ग्लुकोजची कमतरता असते तेव्हा शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. मधुमेही रुग्ण जेव्हा साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि औषधे घेतात, तेव्हा अनेक वेळा अचानक साखरेची पातळी खूप कमी होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे अस्वस्थता, चक्कर येणे, डोकेदुखी आणि झोपायला त्रास होणे यासारखी लक्षणे दिसतात. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये एक गंभीर परिस्थिती देखील उद्भवू शकते. कमी रक्तातील साखरेची समस्या वारंवार उद्भवते, तर जाणून घ्या साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी तुम्ही काय खाऊ शकता- रस प्यातुम्ही सफरचंद, संत्रा, अननस आणि क्रॅनबेरी ज्यूस पिऊ शकता. त्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा. ज्यूसचे जास्त सेवन करू नका हे लक्षात ठेवा. साखरेची पातळी नेहमी संतुलित ठेवा. त्याची घट आणि वाढ नियमितपणे तपासत रहा. आणखी वाचा : Hair Tips : केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी ‘या’ सर्वात प्रभावी घरगुती उपायांचा एकदा नक्की वापर करून पाहा ताजी फळे आणि सुकी फळेरक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ नये म्हणून ताजी फळे किंवा सुकी फळे देखील खाऊ शकतात. केळी, द्राक्षे, सफरचंद आणि संत्री यासारखी कार्बोहायड्रेट समृद्ध फळे खा. ड्रायफ्रुट्समध्ये दोन चमचे मनुके खाऊ शकता. हे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल. फॅट फ्री दूध देखील प्रभावी आहेएक कप कोमट दूध प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. यासाठी फॅट फ्री दुधाचे सेवन करा. दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. आणखी वाचा : Health Tips : पोटातून येणारा गुडगुड आवाज गंभीर आजारांचं लक्षण ठरू शकतं! ‘हे’ पदार्थ खाणं ताबडतोब सुरू करा ग्लुकोजच्या गोळ्याकमी रक्तातील साखरेच्या समस्येत, तुम्ही ग्लुकोजच्या गोळ्या घेऊ शकता. मात्र प्रमाण लक्षात ठेवा. रक्तातील साखर संतुलित करण्यासाठी १५ ते २० ग्रॅम पुरेसे आहे. ते खाल्ल्यानंतर १० ते २० मिनिटे थांबा आणि नंतर साखरेची पातळी तपासा. कँडीचिकट कँडीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, ज्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. ते रक्तप्रवाहात वेगाने शोषले जातात आणि रक्तातील साखर संतुलित करतात. ते खाल्ल्यानंतर १५ मिनिटांनी रक्तातील साखरेची पातळी तपासा.