अनेक जण श्रावण महिना अगदी कडक पाळतात. अनेकांसाठी हा महिना पूर्ण शाकाहार, भक्तिभाव आणि उपवासांचा असतो. श्रावणी सोमवारपासून, अगदी या महिन्यात येणारे विविध सण आणि स्वतःहून ठरवलेली व्रतं असे बहुतांश दिवस उपवासात जातात. प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या पद्धतीने आणि श्रद्धेने हे उपवास करत असतात. मात्र, हे करताना आपल्या प्रकृतीवर याचा विपरीत परिणाम होणार नाही ना? ह्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण, अनेकांना चुकीच्या पद्धतीने उपवास केल्याने त्रास अनुभवावा लागतो. काहींना खूप थकवा येतो तर काहीजण पित्ताच्या त्रासाने हैराण होतात. ह्यावर उपाय काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण सामान्यतः उपवासासाठी जे पदार्थ खातो ते खरंतर पित्त वाढवणारे किंवा पचायला जड असतात. त्यामुळे या पदार्थांचा उलट त्रास होऊ शकतो. उदा. जास्त प्रमाणात साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा इ. खाणं. त्यात अनेकजण उपवासाला अतिरिक्त प्रमाणात चहा देखील पितात. त्यामुळे एकूण सगळ्याची भर पडते. साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ, साबुदाण्याच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू हे पदार्थ अगदी जरी रुचकर लागत असले तरीही त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने यांचा अंश नगण्य असतो. वडे, खीर, लाडू या पदार्थामध्ये तेल आणि साखरेचाही वापर भरपूर असतो. पण ‘पौष्टिक’ असं या पदार्थात काहीच नसतं. मग उपवासाला नेमकं खायचं तरी काय? असाच प्रश्न पडलाय ना? चला तर जाणून घेऊया

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you fast shravan know these things first gst
First published on: 09-08-2021 at 09:49 IST