तुम्ही अनेक मंदिरात मोठमोठ्या धातूच्या घंटा पाहिल्या असतील. दर्शनापूर्वी आणि नंतर भाविक त्या घंटा वाजवतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की मंदिरात घंटा वाजवणे ही केवळ एक परंपराच आहे की यामागेही कोणते वैज्ञानिक कारण आहे? आज आपण मंदिरात घंटा का वाजवली जाते, याचे सविस्तर कारण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • विषाणू आणि सूक्ष्मजंतू नष्ट होतात

मंदिरांमध्ये घंटा का वाजवली जाते यावर शास्त्रज्ञांनी अनेक संशोधन केले आहे. सर्व अभ्यासानंतर, शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले की घंटांचा आवाज सूक्ष्म आहे परंतु दूरगामी आहे. या घंटा वाजवल्याने कंपन निर्माण होते, ज्यामुळे वातावरणात तरंगणारे सूक्ष्म विषाणू आणि सूक्ष्म जीव नष्ट होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते आणि लोक दीर्घकाळ निरोगी राहतात.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

  • घंटा ७ सेकंद वाजत राहते

संशोधनात असेही दिसून आले आहे की मंदिराच्या घंटामधून निघणारा आवाज सुमारे ७ सेकंदांपर्यंत गुंजतो. त्याची प्रतिध्वनी शरीर आणि मनाला खोल शांती प्रदान करते. त्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. यासोबतच नकारात्मक प्रभावही काही काळ संपतो. मंदिराच्या घंटाचा प्रतिध्वनी मनात उत्साह आणि आनंद पसरवतो.

  • देवी-देवतांना संगीत आवडते

सनातन धर्माच्या शास्त्रानुसार देवतांना संगीताची खूप आवड आहे. डमरू, घंटा, शंख, वीणा ही वाद्ये आपण देवी-देवतांच्या विविध चित्रांमध्ये पाहतो. घंटा हे देखील असेच एक वाद्य मानले जाते, जे वाजवल्याने देवता प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. स्कंदपुराणाबद्दल बोलायचे झाले, तर असे सांगण्यात आले आहे की घंटाच्या आवाजाने ‘ओम’ चा आवाज तयार होतो, जो मनासाठी खूप फायदेशीर आहे. ओमचा जप केल्याने देव प्रसन्न होतात असे मानले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the real reason for ringing the bell in the temple learn the scientific side of it pvp
First published on: 01-06-2022 at 09:40 IST