Side Effects of Hot Water: आजकाल एसी ऑफिसमध्ये काम करताना सतत गरम पाणी पिण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तसेच तुम्ही हे ऐकले असेल की बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गरम पाणी पितात. याशिवाय सर्दी टाळण्यासाठी गरम पाणी प्या. त्याच वेळी, काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण खरोखरच गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत का? पण गरम पाणी पिण्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. जर तुम्ही जास्त गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. गरम पाण्याचे तोटे काय आहेत?

तहान लागल्यावर गरम पाणी प्यायल्याने तुमच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. खूप गरम पाण्यामुळे मेंदूच्या पेशींना सूज येऊ शकते. यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात. गरम पाणी पिण्यानेही किडनीचा त्रास होऊ शकतो. मूत्रपिंडात एक विशेष केशिका प्रणाली असते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गरम पाण्यामुळे किडनीवर जास्त दबाव पडतो. याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
What Happens To Body By Drinking One Glass Milk Everyday
एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

( हे ही वाचा: Covid-19 चा विषाणू बरा झाल्यानंतरही सोडत नाही रुग्णाची पाठ; तो ‘या’ ८ आजारांच्या रूपाने पुन्हा पुन्हा हल्ला करतो)

खूप गरम पाण्याचा पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. त्याचा परिणाम आतड्यांवरही होतो. ज्या लोकांना आतड्यांसंबंधी समस्या आहेत त्यांनी गरम पाणी पिणे टाळावे. याशिवाय गरम पाण्यामुळे तोंडात अल्सर होऊ शकतो. गरम पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मेंदू आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात. खूप गरम पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.

मात्र, रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. रोज सकाळी पाणी पिण्याची सवय लावल्यास गॅस आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळतो. शरीरातून विषारी पदार्थ देखील काढून टाकले जातात. याशिवाय जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. वास्तविक, डोकेदुखी शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करा.