भगवान राम हा भगवान विष्णूचा सातवा अवतार मानला जातो. भगवान राम हे नेहमीच आदर्श पुरुष मानले गेले आहेत. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असेही म्हणतात. भगवान रामाचे असे अनेक गुण आहेत, ज्याचा प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात अवलंब करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात. भगवान रामाकडून असे कोणते धडे विद्यार्थी घेऊ शकतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • पराभवावर मात करणारे लक्ष्य

भगवान रामाने नेहमी आपल्या जीवनात एक ध्येय निश्चित करून कार्य केले आणि शेवटी यश मिळवले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही कोणतीही भीती न बाळगता आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. प्रभू रामाप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय गाठताना येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करून ध्येयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  • शांत राहणे

प्रत्येक विद्यार्थ्याने भगवान रामाकडून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत कसे ठेवायचे हे शिकले पाहिजे. जर विद्यार्थ्यांनी हे शिकले तर भविष्यात कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल आणि त्याद्वारे ते आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतील. जीवनात अनेक कठीण प्रसंग आले तरी, भगवान रामाच्या या बोधाने विद्यार्थी मन शांत ठेवू शकतील.

Dussehra 2022: रावणाला सोन्याची लंका कशी मिळाली? ती जाळून राख होण्यासाठी कोणी दिला होता श्राप? जाणून घ्या

  • मोठ्यांचा आदर

प्रत्येक विद्यार्थ्याने प्रभू रामाप्रमाणे नेहमी आपल्या ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. ज्याप्रमाणे भगवान रामाने नेहमी आपल्या पालकांच्या निर्णयाचे पालन केले आणि त्यांनी त्यांच्या निर्णयावर कधीही शंका घेतली नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांचा तसेच इतर मोठ्यांचा आदर केला पाहिजे. असे केल्याने जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो कारण त्यांच्यावर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद कायम राहतो.

  • खरा मित्र असणे

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात अनेक मित्र असतात पण काही मित्र असे असतात ज्यांच्याशी मैत्री खूप घट्ट असते. प्रत्‍येक विद्यार्थ्‍याची प्रभू रामासारखी खरी मैत्री असायला हवी. रामाचा मित्र त्याचा भाऊ लक्ष्मण आणि त्याचे प्रिय भक्त हनुमानजी होते. भगवान राम या दोघांनाही आपल्या जीवनात खूप महत्त्व देत असत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राशी खरी मैत्री ठेवली पाहिजे कारण खरा मित्र वाईट प्रसंगी सर्वात जास्त मदत करतो.

  • गुरुप्रती आदर

प्रभू रामाने आपल्या गुरु वशिष्ठांच्या आज्ञेचे नेहमी पालन केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रत्येक गुरूचा आदर केला पाहिजे कारण गुरूच यशाचा मार्ग दाखवतात आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापूर्वी आपल्या विद्यार्थ्याला नेहमी समजावून सांगतात. त्यामुळे गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे नेहमीच आवश्यक असते.

More Stories onसणFestivals
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra 2022 this teaching every student should take from maryada purushottam lord rama obstacles in the way will be removed pvp
First published on: 24-09-2022 at 21:05 IST