मुंबई : अन्य देशांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याने धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे करोनाविषयक नियमांचे पालन करून गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केले.  करोना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुखपट्टी वापराची सक्ती सध्या कायम  राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 करोना रुग्णांची संख्या देशात खूप कमी झाल्याने यंदा गुढीपाडव्याचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यासाठी तयारी सुरू आहे. अनेक संस्था, उत्सव समित्या, मंडळे आणि राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रम, शोभायात्रा व मिरवणुकांचे आयोजन केले आहे. शोभायात्रांना काही ठिकाणी परवानगी मिळाली असून मुंबईसह अन्य भागातील पोलीस राज्य सरकारच्या करोना निर्बंध शिथिलीकरणाच्या सूचनांची वाट पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी  बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल केले जातील, असे नमूद करून टोपे म्हणाले, करोना रुग्णसंख्या घटल्याने मुखपट्टी सक्ती रद्द करण्याची मागणी अनेक संस्था, संघटना व नागरिकांनी केली आहे. मात्र त्याबाबत वैद्यकीय कृतीगटाची चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा व मिरवणुकांच्या परवानगीबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम