भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह असणाऱ्यांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कोणत्याही कारणामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी त्यांना आहाराबाबतही योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. काही फळं खाल्ल्याने नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. मधुमेह असणाऱ्यांनी अशी फळं खाणे टाळावे. कोणती आहेत अशी फळं जाणून घ्या.

आणखी वाचा: डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल

Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत
health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

मधुमेह असणाऱ्यांनी पुढील फळं खाणे टाळावे:

केळी
केळ्यांमध्ये कर्बोदके (कार्ब्स) व फायबर आढळते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

द्राक्ष
द्राक्षांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच यामधील साखर रक्तात लगेच मिसळली जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

संत्री
संत्र्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते, पण मधुमेहाच्या रुग्णांनी हे फळ टाळावे कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जर संत्री खायची असतील तर हिरवी संत्री निवडावी, ज्यामध्ये आंबटपणा जास्त असतो.

आणखी वाचा: आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या

चिकू
चिकूदेखील अत्यंत गोड फळ आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अशा गोड फळांऐवजी डाळिंब, पपई, पेरू ही फळं मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खावी.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)