जेवणाच्या चुकीच्या सवयी, बदललेली जीवनशैली, वाढत्या प्रदूषणाचा वातावरणासह खाद्यपदार्थांवर होणारा परिणाम या कारणांमुळे रक्त अशुद्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. रक्त अशुद्ध झाल्यास रक्ताद्वारे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना मिळणारे पोषकतत्त्व मिळत नाहीत आणि यामुळे काही आजरांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे रक्त शुद्ध असणे गरजेचे असते. यासाठी काही पदार्थ फायदेशीर ठरू शकतात, जे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

बीट
बीटरूटमध्ये बीटासायनिन हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे अँटीऑक्सिडेंट आढळते. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. रोजच्या जेवणात किंवा सॅलेडमध्ये याचा समावेश करू शकता किंवा बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करून साधारण १० मिनिटांपर्यंत पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर त्यात थोडी काळी मिरी आणि जिरे पावडर मिसळा. दोन ते तीन आठवडे प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

आणखी वाचा: सतत होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं लगेच जाणून घ्या

आले आणि लिंबू
आले वाटून घेऊन त्यात २ ते ३ थेंब लिंबाचा रस टाका, त्यानंतर त्यात थोडे मीठ आणि काळी मिरी टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

तुळशीची पानं
तुळस अनेक कारणांसाठी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच तुळशीच्या पानांमध्ये ऑक्सिजनही भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.

कडुनिंबाची पानं
रक्त शुद्ध करण्यासाठी कडुनिंबाची पानं फायदेशीर मानली जातात. यासाठी कडुनिंबाची पानं रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता किंवा पानं वाटून पाण्यात मिसळून ते पाणी प्या.

आणखी वाचा: सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या

लसूण
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्याबरोबर रक्त शुद्ध होण्यासही मदत मिळते.

आवळा
रक्तातील अशुद्ध घटक काढून रक्त शुद्ध करण्यास आवळा फायदेशीर मानला जातो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)