Benefits Of Hot Water Shower: गरम पाण्याने आंघोळ करणे हे दिवसभराचा ताण – थकवा दूर करण्याचा उत्तम मार्ग आहे. पण विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने आंघोळ करावी का? यामुळे घामोळे किंवा पुरळ येण्याची शक्यता असते का असा प्रश्न आपल्यालाही पडू शकतो. कदाचित आजचा हा लेख वाचल्यावर तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही अत्यंत उपयुक्त फायदे आज आम्ही आपणास सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाण्याने आंघोळ करण्याची इच्छा असली तरी सध्या अनेक विषाणूंचा प्रसार वेगाने होत आहे अशावेळी थंड पाण्याची आंघोळ सर्दी, खोकला, ताप यांचा धोका निर्माण करते यापेक्षा गरम पाण्याने आंघोळ केल्यास आपल्या शरीराला खालीलप्रमाणे फायदे मिळू शकतात. चला तर पाहूया…

गरम पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे.. (Benefits Of Hot Water Shower)

१) स्नायूंवर ताण कमी होतो

गरम पाण्याने आंघोळ करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते. तुमची सक्रिय जीवनशैली असो किंवा बैठी जीवनशैली, तुमचे स्नायू सतत कार्यरत असतात. पण वयानुसार किंवा हालचालीच्या अभावाने ते ताठ होऊ शकतात, ज्यामुळे स्नायू दुखणे आणि अस्वस्थता येते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या स्नायूंना आराम मिळू शकतो.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

२) रक्ताभिसरण सुधारते

गरम पाण्याच्या आंघोळीचा आणखी एक फायदा म्हणजे याने रक्त रक्ताभिसरण सुधारते.गरम पाण्याच्या आंघोळीने रक्तवाहिन्यांचे प्रसरण होते, ज्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होऊ शकतो.रक्ताभिसरण सुरळीत झाल्यावर जळजळ कमी होण्यास तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होऊ शकते. सुधारित रक्ताभिसरणाने तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये अधिक ऑक्सिजन आणि पोषक सत्व मिळून त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

३) तणाव आणि चिंता कमी करते

तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी गरम पाण्याची आंघोळ हा एक चांगला मार्ग आहे. पाण्याची उष्णता तुमच्या मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करू शकते, तणाव आणि चिंता कमी करते. याव्यतिरिक्त, पाण्याचा आवाज सुखदायक असू शकतो. तुम्हाला विशेषतः तणाव किंवा चिंताग्रस्त वाटत असेल, तर शांत वाटण्यासाठी गरम पाण्याचा शॉवर घेण्याचा विचार करा.

४) झोप येण्यास मदत होते

जर तुम्हाला रात्री झोपायला त्रास होत असेल तर गरम पाण्याने आंघोळ केल्यास मदत होऊ शकते. झोपायच्या आधी गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते, जे तुमच्या शरीराला झोपेची वेळ झाल्याचे संकेत देऊ शकते.

हे ही वाचा<< उंचीनुसार तुमच्या कंबरेची रुंदी आहे का परफेक्ट? हेल्दी शरीरासाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

५) सर्दी आणि ताप असल्यास…

गरम पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी आणि तापाच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा तुम्हाला सर्दी किंवा ताप होतो तेव्हा तुमचे शरीर व्हायरसशी लढण्यासाठी कठोर परिश्रम करत असते. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर रक्तप्रवाह सुरळीत होण्यास, खोकला कमी करण्यास मदत होऊ शकते. शॉवरमधून निघणारी वाफ तुमचा घसा आणि श्वासनलिका शांत करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)