रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अनेकदा महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात पोट फुगणे, सूज येणे आणि जडपणा अशा सामान्य तक्रारी जाणवतात. अनेकदा महिलांना वाटते की जास्त पाणी प्यायल्याने शरीरात पाणी साठते पण तज्ज्ञांच्या मते हा एक गैरसमज आहे. पुरेसे पाणी प्यायले, सामान्यपणे आहार घेतला आणि आवश्यकतेनुसार सक्रिय राहून अथवा व्यायाम करूनही त्यांच्या शरीरात अचानक जास्त पाणी का साठते. असे का होते हे अनेक महिलांना समजत नाही. याबाबत एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, आहारतज्ज्ञ श्वेता जे पांचाल यांनी स्पष्ट केले की, “रजोनिवृत्तीमुळे होणारे पोट फुगी हे अतिरिक्त पाण्यामुळे नसून शरीरातील अंतर्गत असंतुलनामुळे होते.”
कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “रजोनिवृत्तीमध्ये शरीरात पाणी साठणे हे ‘जास्त पाण्यामुळे’ होत नाही तर ते असंतुलनामुळे होते.” त्यांच्या मते, रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोन्स, खनिजांची पातळी आणि रक्ताभिसरणातील बदलांमुळे शरीरात पाणी साठण्याचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा सोडियमची पातळी जास्त असते आणि पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमची पातळी कमी होते, तेव्हा शरीर एक संरक्षक प्रतिक्रिया म्हणून पाणी साठवून ठेवू शकते. रजोनिवृत्तीच्या काळात, हार्मोन्स, खनिजे आणि रक्ताभिसरणातील बदलांमुळे शरीरात पाणी साठण्याचे प्रमाण अनेकदा वाढते. जेव्हा सोडियमचे प्रमाण जास्त असते आणि पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता असते, तेव्हा शरीर पाणी धरून ठेवते. “
त्यांनी सांगितले की, काही विशिष्ट पोषक तत्वे पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी संतुलन पुनर्संचयित करण्यावर केंद्रित करा. पोटॅशियमयुक्त पदार्थ (जसे की बटाटे, पालक, नारळाचे पाणी) शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यास मदत करता आणि मॅग्नेशियम रक्तवाहिन्या शिथिल करण्यास मदत करते ज्यामुळे पोट फुगी कमी होण्यास मदत होते.”
त्यांनी अत्यंत कठोर आहार निर्बंधांविरुद्ध सावधगिरीचा इशाराही दिला आणि स्पष्ट केले की, “मीठ पूर्णपणे बंद करणे उलट परिणाम करू शकते—संतुलन महत्त्वाचे आहे,” तर हालचाल केल्याने लसिका प्रवाह आणि द्रव निचरा सुधारतो,” आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराला पाणी बाहेर टाकणे सुरक्षित आहे हे कळते. शरीरात पाणी साठणे ही खनिजे आणि हायड्रेशनची समस्या आहे, जास्त पाण्यामुळे निर्माण होणारी समस्या नाही.”
पण रजोनिवृत्तीदरम्यान होणारे कोणते हार्मोनल आणि शारीरिक बदल शरीरात पाणी साठण्यास कारणीभूत ठरतात? (But what hormonal and physiological changes during menopause contribute to water retention?)
बन्नेरघट्टा रोडवरील बोन अँड बर्थ क्लिनिक आणि रेनबो हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. गाना श्रीनिवास यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “रजोनिवृत्तीदरम्यान, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतील चढ-उतार आणि अखेरीस होणारी घट, शरीरातील द्रवांच्या नियमनावर परिणाम करते. इस्ट्रोजेन रेनिन अँजिओटेन्सिन प्रणाली आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करते, ज्यामुळे तात्पुरते पाणी साठणे आणि पोट फुगी होऊ शकते. प्रोजेस्टेरॉनचा सौम्य मूत्रवर्धक प्रभाव असतो, त्यामुळे त्याची पातळी कमी झाल्यानेही सूज आल्यासारखे वाटू शकते.”
शरीरातील द्रवांच्या नियमनामध्ये खनिजांचे संतुलन महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. श्रीनिवास नमूद करतात, “अतिरिक्त सोडियममुळे शरीरात पाणी साठून राहण्यास प्रोत्साहन मिळते, तर पोटॅशियम पेशींमधील द्रवांचे संतुलन राखण्यास आणि मूत्रपिंडाच्या कार्याला आधार देण्यास मदत करते. मॅग्नेशियम स्नायू शिथिल करण्यास मदत करते, दाह कमी करते आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा आहार, तणाव किंवा मध्यम वयात सामान्य असलेल्या चयापचय बदलांमुळे या खनिजांचे संतुलन बिघडते, तेव्हा महिलांना पोट फुगल्यासारखे किंवा सूज आल्यासारखे वाटू शकते.”
पोट फुगणे आणि शरीरात पाणी साठणे कमी करण्यासाठी महिला त्यांच्या आहारात आणि पाणी पिण्याच्या सवयींमध्ये कसे बदल करू शकतात?(How can women adjust their diet and hydration habits to reduce bloating and fluid retention?)
निर्बंध घालण्याऐवजी संतुलन साधणे हे ध्येय असले पाहिजे. डॉ. श्रीनिवास सुचवतात की, “पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांना सोडियमचे नियमन करण्यास मदत होते आणि शरीरात अतिरिक्त पाणी साठण्यास प्रतिबंध होतो. पाणी पिण्याचे प्रमाण कमी करण्यापेक्षा दिवसभर सातत्याने पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.
डॉ. श्रीनिवास पुढे म्हणतात, “आहारातील निवडीमुळे लक्षणीय फरक पडू शकतो. केळी, नारळाचे पाणी, पालक आणि डाळी यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवल्याने सोडियममुळे शरीरात पाणी साठण्यास प्रतिबंध होतो. सुकामेवा, बिया, संपूर्ण धान्य आणि पालेभाज्या यांसारख्या मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पोट फुगी कमी होण्यासही मदत होते. घरगुती जेवणातून मीठ पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा, जास्त सोडियम असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे अधिक प्रभावी आहे.”
त्या पुढे सांगतात की, नियमित शारीरिक हालचाल, विशेषतः चालणे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात पाणी साठण्याचे प्रमाण कमी होते. चांगली झोप आणि तणावाचे व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे आहे, कारण रजोनिवृत्तीच्या काळात कॉर्टिसोलमधील चढ-उतारामुळे शरीरात पाणी साठण्याची समस्या आणखी वाढू शकते.
रजोनिवृत्तीमुळे शरीरात पाणी साठणे ही चिंतेची बाब केव्हा बनते? (When does menopause related water retention become a concern?
)
रजोनिवृत्तीच्या काळात सौम्य पोट फुगणे किंवा तात्पुरती सूज येणे सामान्य आहे, परंतु शरीरात सतत किंवा तीव्र पाणी साठत असल्यास त्याचे तपासणी केली पाहिजे. “जर सूज अचानक आली असेल, वेदना होत असतील, फक्त एकाच अवयवावर परिणाम करत असेल, किंवा श्वास घेण्यास त्रास, वेगाने वजन वाढणे, किंवा थकवा यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर महिलांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा,” असे डॉ. श्रीनिवास आवर्जून सांगतात.
जीवनशैलीतील बदलांनीही शरीरात पाणी साठण्यात सुधारणा होत नसेल, तर त्याचा संबंध थायरॉईड विकार, मूत्रपिंडाच्या समस्या, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार किंवा औषधांच्या दुष्परिणामांशी असू शकतो. काही प्रकरणांमध्ये, इन्सुलिन प्रतिरोध (insulin resistance) यांसारखे चयापचयातील बदल देखील शरीरातील द्रवाचे असंतुलन होण्यास कारणीभूत ठरू शकतात. “जर सूज सतत येत असेल, वाढत असेल, किंवा इतर लक्षणे दिसत असतील, तर मूळ कारणे शोधण्यासाठी रक्त तपासणी आणि हृदय व मूत्रपिंडाच्या आरोग्याच्या मूल्यांकनासह वैद्यकीय तपासणी करण्याची शिफारस केली जाते,” असे डॉ. श्रीनिवास सांगतात.
